शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत

By राजू इनामदार | Updated: June 9, 2023 17:04 IST

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघतात, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जातात, यामुळे सामाजिक वातावरण बिघडते

पुणे: औरंगजेबाच्या औलादी अचानक आल्याच कशा? असा प्रश्न गृहमंत्रीच करत असतील तर जनतेने काय करायचे? अत्याधुनिक साधनांचा वापर करा व शंका आहे तर त्यांचा शोध घ्या असे आवाहन काँग्रेसने सरकारला केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. गृहखाते त्यासाठीच आहे. औरंगजेबाच्या औलादी एकदम कशा आल्या असा प्रश्न दंगलींच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी केला, पण याच काय कोणत्याही गुन्ह्याचा शोध घेण्याचे काम गृहखात्याचेच आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापक करून गृहमंत्र्यांनी याचा शोध घ्यावा असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जात आहेत, यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. याला जबाबदार कोण आहे याचाही गृहखात्याने विचार करावा. विशिष्ट विचारांना खतपाणी मिळेल असे सरकारकडून केले जात आहे का याकडे सरकारने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. दंगल नियंत्रणाबाबत मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढले. नको त्या शब्दांमध्ये संभावना केली, त्यानंतर तरी सरकार गंभीरपणे वागेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले.

भारतीय प्रशासकीय तसेच भारतीय पोलिस सेवेत वरिष्ठ पदावर येताना देश, देशाची घटना याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शपथेचे स्मरण कायम ठेवावे, सत्ताधाऱ्यांकडून घटनाबाह्य, भविष्यात गंभीर होतील अशा गोष्टी घडत असतील तर त्याची त्यांना वेळीच पूर्वसुचना द्यावी असे आवाहनही तिवारी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस