शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत

By राजू इनामदार | Updated: June 9, 2023 17:04 IST

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघतात, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जातात, यामुळे सामाजिक वातावरण बिघडते

पुणे: औरंगजेबाच्या औलादी अचानक आल्याच कशा? असा प्रश्न गृहमंत्रीच करत असतील तर जनतेने काय करायचे? अत्याधुनिक साधनांचा वापर करा व शंका आहे तर त्यांचा शोध घ्या असे आवाहन काँग्रेसने सरकारला केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. गृहखाते त्यासाठीच आहे. औरंगजेबाच्या औलादी एकदम कशा आल्या असा प्रश्न दंगलींच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी केला, पण याच काय कोणत्याही गुन्ह्याचा शोध घेण्याचे काम गृहखात्याचेच आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापक करून गृहमंत्र्यांनी याचा शोध घ्यावा असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जात आहेत, यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. याला जबाबदार कोण आहे याचाही गृहखात्याने विचार करावा. विशिष्ट विचारांना खतपाणी मिळेल असे सरकारकडून केले जात आहे का याकडे सरकारने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. दंगल नियंत्रणाबाबत मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढले. नको त्या शब्दांमध्ये संभावना केली, त्यानंतर तरी सरकार गंभीरपणे वागेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले.

भारतीय प्रशासकीय तसेच भारतीय पोलिस सेवेत वरिष्ठ पदावर येताना देश, देशाची घटना याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शपथेचे स्मरण कायम ठेवावे, सत्ताधाऱ्यांकडून घटनाबाह्य, भविष्यात गंभीर होतील अशा गोष्टी घडत असतील तर त्याची त्यांना वेळीच पूर्वसुचना द्यावी असे आवाहनही तिवारी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस