शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत

By राजू इनामदार | Updated: June 9, 2023 17:04 IST

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघतात, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जातात, यामुळे सामाजिक वातावरण बिघडते

पुणे: औरंगजेबाच्या औलादी अचानक आल्याच कशा? असा प्रश्न गृहमंत्रीच करत असतील तर जनतेने काय करायचे? अत्याधुनिक साधनांचा वापर करा व शंका आहे तर त्यांचा शोध घ्या असे आवाहन काँग्रेसने सरकारला केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. गृहखाते त्यासाठीच आहे. औरंगजेबाच्या औलादी एकदम कशा आल्या असा प्रश्न दंगलींच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी केला, पण याच काय कोणत्याही गुन्ह्याचा शोध घेण्याचे काम गृहखात्याचेच आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापक करून गृहमंत्र्यांनी याचा शोध घ्यावा असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघत आहेत, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जात आहेत, यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. याला जबाबदार कोण आहे याचाही गृहखात्याने विचार करावा. विशिष्ट विचारांना खतपाणी मिळेल असे सरकारकडून केले जात आहे का याकडे सरकारने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. दंगल नियंत्रणाबाबत मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढले. नको त्या शब्दांमध्ये संभावना केली, त्यानंतर तरी सरकार गंभीरपणे वागेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले.

भारतीय प्रशासकीय तसेच भारतीय पोलिस सेवेत वरिष्ठ पदावर येताना देश, देशाची घटना याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शपथेचे स्मरण कायम ठेवावे, सत्ताधाऱ्यांकडून घटनाबाह्य, भविष्यात गंभीर होतील अशा गोष्टी घडत असतील तर त्याची त्यांना वेळीच पूर्वसुचना द्यावी असे आवाहनही तिवारी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस