शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड

By विवेक भुसे | Updated: December 14, 2023 11:53 IST

जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असुन अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार

पुणे: समाजसेवक अण्णा हजारे यांना लोक दुसरे महात्मा गांधी म्हणतात, हे हास्यास्पद असून त्यांनी माहिती अधिकार कायदा आणण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी काही प्रयत्न केल्याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे उपलब्ध नाही. तसेच अण्णा हजारे यांच्या मुळे जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अंमलात आला हे देखील सपशेल खोटं आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळविले आहे. 

या माणसामुळे म्हणजेच अण्णा हजारे यांच्या मुळे देशाचं वाटोळं झालं, गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे बदनामीकारक वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो प्रसिद्ध करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. अण्णा हजारे यांची बदनामी केली म्हणून अण्णांचे वकील अ‍ॅड. मिलिंद द. पवार यांनी अण्णा हजारे यांच्या वतीने अण्णांची बदनामी केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.  अ‍ॅड. पवार यांच्या कायदेशीर नोटिशीला जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वकीलांमार्फत उत्तर दिले आहे.     जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या उत्तरातून म्हणतात की, अण्णा हजारे हे दुसरे गांधी आहेत असं लोकं म्हणतात, हे हास्यास्पद आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याच्या अंमल बजावणीसाठी किंवा कायदा आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी काही प्रयत्न केल्याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आला हे खोटे असुन, जनलोकपालसाठी अनेक आंदोलनं झाले. त्यामध्ये अनेक लोकं होते. त्यापैकी अण्णा हजारे हे एक व्यक्ती म्हणून हजर होते. अण्णा हजारे स्वत: ची प्रतिष्ठा व प्रतिमा उंचावण्यासाठी स्वत:ला दुसरे गांधी म्हणवून घेत आहेत. अण्णा हजारे यांच्यामुळे माहिती अधिकार कायदा अंमलात आला, अण्णा हजारे यांच्या मुळे जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अंमलात आला हे देखील सपशेल खोटं आहे. त्यामुळे मी काही कोणाची बदनामी केलेली नाही. या माणसामुळे देशाचं वाटोळं झालं हे वाक्य माझे वैयक्तिक मत होते. अण्णा हजारे यांनी अ‍ॅड़ मिलिंद पवार यांच्या वतीने पाठवलेली कायदेशीर नोटीस तुम्ही परत घ्यावी. मला तुमच्या नोटीसला कारण नसताना उत्तर देणं तुम्ही भाग पाडले म्हणून तुम्हीच मला १ लाख रुपये द्यावेत. माझ्यावर  कुठलीही कायदेशीर कारवाई करू नये. असे उत्तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अ‍ॅड़ मिलिंद पवार यांना व अण्णा हजारे यांना पोस्टाने पाठविले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असुन अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे अण्णांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडanna hazareअण्णा हजारेCourtन्यायालयMahatma Gandhiमहात्मा गांधी