शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

‘आयटी' कर्मचाऱ्यांना हवी मतदानासाठी सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:35 IST

लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. मात्र आयटी कंपन्यामधील कर्मचा-यांना या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावणे हा भारतीय दंडविधान कलम 135 बी चा भंग

पुणे : मतदानाच्या दिवशी आयटी कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात येत असली तरी तरी महत्वाचे प्रोजेक्ट असल्याचे कारण पुढे करीत अनेक कंपन्या कर्मचा-यांना मतदानाच्या दिवशी देखील कामावर येण्यास भाग पाडतात. त्यामुळे पुण्याबाहेरील कर्मचा-यांना मतदानापासून वंचित राहावे लागते. आयटीमधील केवळ 60 टक्केच कर्मचारीच मतदानाचा हक्क बजावू शकतात, याकडे लक्ष वेधत सर्व कर्मचा-यांना  मतदानाचा हक्क मिळण्याकरिता ऑल इंडिया फोरम फॉर आयटी/आयटीज एम्प्लॉईज, ( फाईट) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कामगार सहआयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.      लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. मात्र आयटी कंपन्यामधील कर्मचा-यांना या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. संपूर्ण देशभरात जवळपास 56 लाख आयटी कर्मचारी आहेत. स्वत:चे गाव सोडून अनेक कर्मचारी नोकरीसाठी अनेक ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. पुण्यातही जवळपास 5 ते 6 लाख कर्मचारी स्थायिक आहेत. त्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी हे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आले आहेत. हे कर्मचारी दुस-या भागात स्थलांतरित झाले असले तरी त्यांचे नाव मूळ गावच्याच मतदारयादीत आहे. त्यामुळे मतदानासाठी त्यांना मूळ गावी जाणे भाग आहे. आयटी कंपन्यांकडून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येत असली तरी महत्वाचे प्रोजेक्ट असल्याचे कारण सांगत कर्मचा-यांना कंपनीमध्ये बोलावले जाते आणि वेळ मिळेल तसे मतदान करूया असे सांगितले जाते. मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावणे हा भारतीय दंडविधान कलम 135 बी चा भंग आहे. परंतु कामावर बोलावल्यामुळे पुण्याबाहेरील कर्मचा-यांना मतदानाला मुकावे लागते. कर्मचा-यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी कामगार सहआयुक्त निखिल वाळके यांनी निवेदन देण्यात आल्याची माहिती फाईटचे प्रदेशाध्यक्ष परमजित माने यांनी दिली.------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान