शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

By राजू हिंगे | Updated: February 25, 2024 17:54 IST

भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जातीये

पुणे: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. काही राजकीय मंडळी गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात. तर दुसर्‍या बाजूला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना घडते. त्या सर्व घडामोडी दरम्यान आता ड्रग्ज सापडत आहेत. अमली पदार्थांपासून तरुणांनी दूर राहिले पाहिजे. त्यामुळे राज्यात आज सरकार आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही आमदार पोलिसांबाबत काहीही विधान करत आहेत. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे हे सरकार बिल्डर, ठेकेदार की सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे अशी टिका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते , माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्येकेली आहे.  

 यावेळी माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण , माजी आमदार माेहन जोशी उपस्थित होते.   आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यातील   रुबी हॉल पासून पुढे जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम देखील पूर्ण झालेले आहे आणि विमानतळाच्या ट्रमिनअल दोनचे उदघाटन अदयाप ही होत नाही. विमानतळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाही म्हणुन पाच महिने झाले विमानतळाचे उदघाटन झाले नाही.  केवळ व्हीआयपींना वेळ नसल्याने अद्यापपर्यंत उद्घाटन झाले नाही. तसेच दुसर्‍या एका पुलाचे काम अर्धवट आहे. त्याचे उदघाटन करण्यास घटनाबाह्य मुख्यमंत्री आतुर असल्याचे दिसत आहे. आजपर्यंत अर्धवट पुलाच्या कामाचे उदघाटन कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आपण पाहिले आहे का? काल पोर्णिमा असल्याने त्यांना वेळ नव्हता. अमावस्या आणि पोर्णिमेला शेती करायला जातात. हे त्यांच्या आजवरच्या दौर्‍यांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता तरी पुलाचे उद्घाटन करून नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका करा, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली.

भाजपाला लोकशाही नको

राज्यातील छोटे छोटे पक्ष संपवा असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने लोकशाही संपवली आहेच. २०२२ मध्ये शिवसेना, २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला. तसेच आता २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजपाला लोकशाही नको आहे आणि तुम्ही मला ज्या व्यक्ती बाबत प्रश्न विचारला, त्यांचा चायनाशी जवळचा संबध असल्याचे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निवडणूक आयोगाच्या सूचना असतानाही आणि चार वर्षे पूर्ण झालेली असतानाही अनेक शहरांचे आयुक्त देखील बदलले नाहीत, या मागचं गौडबंगाल काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला

आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर चर्चा सुरू असून पुढील काही दिवसात त्याचा निर्णय जाहीर होईल. आम्ही जागा वाटपात मध्ये कोणीही भांडत नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतली. आम्ही जागासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी लढत आहे.  भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण