शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोणाला थोबडवायला कायदा आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 19:48 IST

कोणी कसले कपडे घातले म्हणून समजा बिघडला, असे मला वाटत नाही

पुणे : कोणी कोणते कपडे घातले म्हणून समाज बिघडला, याला काही अर्थ नाही. मात्र म्हणून कोणी कोणाला समोर आली तर थोबडवीन म्हणत असेल तर राज्यात कायदा, सुव्यवस्था आहे की नाही याचा जाब विचारावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार विद्या चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना टोला लगावला.

अभिनेत्री उर्फी हिने घातलेल्या पेहरावावरून सध्या वादळ उठले आहे. वाघ यांनी ती समोर आली तर थोबडवीन असे वक्तव्य केले होते. त्याला चव्हाण यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महागाई विरोधी आंदोलनाची माहिती देण्यासाठी त्या पक्षाच्या शहर कार्यालयात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, कोणी कसले कपडे घातले म्हणून समजा बिघडला, असे मला वाटत नाही. माझा त्यावर विश्वास नाही. मात्र असे कपडे घालणाऱ्याला कोणी थोबडवीन म्हणत असेल तर मात्र सरकारला कायदा व सुव्यवस्थेचा जाब विचारावा लागेल. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजियाखान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच वैशाली नागवडे, युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर व अन्य महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

विद्या चव्हाण म्हणाल्या, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई प्रचंड वाढली आहे. सत्तेवर येताना त्यांनी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगारासारखी आकर्षक वचने दिली होती. सत्तेवर आल्यापासून मागील ८ वर्षांत त्यांना याचा विसर पडला आहे. सामान्यांना जगणे अवघड झाले आहे. याविरोधात महिला काँग्रेस राज्यात सर्वत्र जिल्हानिहाय चौक सभा, मोर्चा, समूहांच्या भेटीगाठी, चर्चा यातून जनजागृती करणार आहे.

महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी आपटेरोडवरली सेंट्रल पार्कमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तिथून पुणे जिल्ह्यातील आंदोलनाला सुरुवात होईल. ते पुढे पाच महिने वेगवेगळ्या जिल्ह्यात चालणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेChitra Waghचित्रा वाघUrfi Javedउर्फी जावेदPoliticsराजकारण