शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

‘आयआयई’ वादाच्या भोव-यात, अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:28 AM

जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पुणे : जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या अध्यक्षा अरुणा गिरी आणि डॉ. सदानंद मोरे यांच्यासह चार विश्वस्त मंडळातील सदस्यांनीही काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे. संस्थेतील कामकाजाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे निवड करण्यात आली.जे.पी. नाईक व चित्रा नाईक यांनी शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘आयआयई’च्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली. मात्र, सध्या या संस्थेत अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. डॉ. मुणगेकर यांनी मंगळवारी याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.ते म्हणाले, की गिरी यांनी दीड महिन्यापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १५ दिवसांतच उपाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉ. सुहास पळशीकर, धनवंती हर्डीकर व विनया मालती हरी यांनी राजीनामा दिला आहे. संस्थेच्या कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळामध्ये किमान सात सदस्य कार्यरत असणे अपेक्षित आहे. पाच जणांनी राजीनामा दिल्याने केवळ पाचच सदस्य उरले होते. त्यामुळे मंगळवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या आजीव सदस्यांमधील तीन व सन्माननीय सदस्यांमधील दोघांची मंडळावर निवड करण्यात आली. सुचेता कोरगावकर, जयंत कळके, शरद जावडेकर, दिलीप नाचणे वप्रा. आर. एस. देशपांडे अशी त्यांची नावे आहेत.या बैठकीत डॉ. मुणगेकर यांची अध्यक्ष म्हणून, तर प्रा. देशपांडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेतील संचालक प्रा. मर्झबान जाल यांची वर्तणूक योग्य नसल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, त्यांना यापुढे संस्थेच्या आवारातही प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे.जाल यांच्या जागी प्रा. बी. एन. कांबळे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, असे मुणगेकर यांनी सांगितले. दरम्यान, जाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळूनलावून हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. तसेच, विश्वस्तमंडळच बेकायदेशीर असून अनेक अनियमित गोष्टी संस्थेत सुरू असल्याचे स्पष्ट केले.>स्मृतिचिन्हे, पुरस्कार परत कराकाही दिवसांपूर्वी अरुणा गिरी व त्यांच्या मुलाने संस्थेत येऊन तेथील नाईक यांची काही स्मृतिचिन्हे, पुरस्कार जबरदस्तीने घरी नेले आहेत. ही कृती अत्यंत चुकीची असून त्यांच्याविरोधात पोलिसांतही तक्रार करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गिरी यांना घरी नेलेले पुरस्कार कोणत्याही अटीशिवाय परत करण्याचे पत्राद्वारे कळविले जाणार आहे, अशी माहिती मुणगेकर यांनी दिली.कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या विरोधात तक्रार नाही. संस्थेच्या एकूणच कामकाजाच्या पद्धतीला कंटाळून राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत काम करणे अशक्य होते. - डॉ. सदानंद मोरेसंस्थेतील काही जुन्या मुद्द्यांवर वाद आहेत. विश्वस्त मंडळाच्या बैठकीतही त्यावरून मतभेद होते. या गोंधळाच्या स्थितीतकाम करणे तसेच संस्थेमध्ये पूर्णवेळ देणेही शक्य नसल्याने राजीनामा दिला आहे. - विनया मालती हरी>आयसीएसएसआरसंस्थेची चौकशी सुरूइंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रीसर्च (आयसीएसएसआर) या संस्थेकडून आयआयईमध्ये अनियमितता असल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार सह धर्मादाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संस्थेचे कामकाज, सदस्यांची निवड, बैठका यांसह विविध मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे.- कैलास महाले, निरीक्षक, सह धर्मादाय आयुक्त कार्यालय