शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

माओवादी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा, जनहित याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 02:24 IST

जनहित याचिकेद्वारे मागणी : सोमवारी होणार युक्तिवाद

पुणे : एल्गार परिषदेच्या आणि कोरेगाव भीमा घटनेबाबत अटक आरोपीकडे यूएपीए कायद्यांतर्गत तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नाही. त्यामुळे गुन्ह्याचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला (एनआयए) सोपविण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालात करण्यात आली आहे.

सतीश सुग्रीव गायकवाड (वय ३५, दापोडी) यांच्या वतीने अ‍ॅड. तौसीफ शेख आणि अ‍ॅड. कुमार कलेल यांनी ही जनहीत याचिका दाखल केली आहे. ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चिथावणीखोर भाषणे करण्यात आल्याचा आरोप करून तुषार दामगुडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर एप्रिल महिन्यात सुरेद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांवर यूएपीएअंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार एनआयएला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य आणि दबावरहित होण्यासाठी एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा एनआयएकडे तपासासाठी द्या, सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी शिवाजी पवार यांच्यावर कारवाई करून या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत त्यांना निलंबित करा. या अर्जावरील निर्णय होईपर्यंत पुणे पोलिसांच्या तपासाला स्थगिती द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारेकरण्यात आली आहे. यावरील युक्तिवाद सोमवारी (दि. ३ सप्टेंबर) रोजी होणार आहे.पाचही जणांना नजरकैैदमंगळवारी वरवरा राव, अरुण फरेरा आणि वर्नोन गोन्सालविस यांना अटक केली होती. तर, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांना अटक करण्याची तयार करण्यात आली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकेला स्थगिती दिली होती. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाने या पाचही जणांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय