शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

इच्छुकांनी कसली कंबर

By admin | Updated: January 11, 2017 03:06 IST

सांगवी व पिंपळे गुरव परिसरात प्रचाराची चढाओढ आणि स्पर्धात्मक राजकारण बघायला मिळत असून, अनेक दिग्गज आणि मुरलेले राजकारणी कंबर कसून प्रचारास लागले आहेत.

सांगवी : सांगवी व पिंपळे गुरव परिसरात प्रचाराची चढाओढ आणि स्पर्धात्मक राजकारण बघायला मिळत असून, अनेक दिग्गज आणि मुरलेले राजकारणी कंबर कसून प्रचारास लागले आहेत. वार्डची विभागणी आणि अनेक नवे चेहरे पुढे आल्याने सांगवी परिसरात संशयकल्लोळ झाला आहे. या द्विधा परिस्थितीने जनतेचे डोके चक्रावून गेले आहे. परिसरातील मुख्य वार्ड ३१ मधून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत दिसून येत आहे. जुन्या सांगवीतील प्रत्येक उमेदवार विकासकामांचे श्रेय आपलेच असे म्हणून जागोजागी फ्लेक्स लावून जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन उमेदवार राजकारणाची चव घेण्यासाठी स्पर्धेत उतरले असून, घरोघरी जाऊन मतदारांना भेटी देण्यापासून लग्न, वाढदिवसापर्यंत जनतेची काळजी घेताना उमेदवार दिसत आहेत. रस्त्याने जाताना ढुंकूनही न पाहणारे नेते आस्थेवाईकपणे जनतेची विचारपूस करताना दिसत आहेत. कामाचा वेग वाढवून जनतेच्या मुख्य गरजा लक्षात घेऊन विद्यमान नेते अनेक विकासकामे करताना दिसत आहेत. त्यामुळे नवीन रस्ते, चौकांचे सुशोभीकरण, पथदिवे सगळे काही अचानक बदलले असून, परिसराला चांगले दिवस आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या राजकारणात सांगवीची निर्णायक भूमिका असते. पूर्वी होणाऱ्या मारामाऱ्या, गॅँगवॉर आणि चढाओढ यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत मात्र पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे. काही भागात भावकी-गावकीचा नारा दिला जात आहे. काही भागात दादागिरी, पैसा यानेही डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. निवडणूक तोंडावर आल्याने फोडाफोडीच्या राजकारणालाही जोर आला आहे. पक्षात वागणूक चांगली मिळत नाही असा अचानक साक्षात्कार झाल्यासारखे अनेकजण पक्ष सोडत आहेत. नेत्यांच्या फोडाफोडीला सध्या उधाण आले आहे. त्यामुळे मात्र, मतदारांचा गोंधळ उडत आहे. या सर्व घडामोडीत मात्र, पक्षाचा कार्यकर्ता भरडून निघत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रचाराच्या हायटेक यंत्रणा, मजुरीवरील कार्यकर्ते, फोडाफोडीचे राजकारण यांमुळे यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. जनताही या उमेदवारांची केविलवाणी धडपड पाहून मत कोणाच्या पारड्यात टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)जाधववाडीत नागरिकांवर छाप पाडण्याकरिता फंडे जाधववाडी : निवडणुका जवळ आल्याने नागरिकांशी जवळीक साधण्याकरिता रोज नवनवे हातखंडे वापरताना सध्या इच्छुक उमेदवार दिसत आहेत. अगदी सकाळपासूनच प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण आधुनिक श्रावण बाळ होत नागरिकांना तीर्थक्षेत्रे फिरवून आणीत आहे, तर कोणी शासनाने दिलेली आधार कार्ड स्मार्ट करून देण्याचा स्मार्ट प्रयत्न करताना दिसत आहे . प्रभागरचना बदलल्याने इच्छुकांसहित ज्यांनी नगरसेवकपद भोगलेय तेही खडबडून जागे झाले आहेत. जे पाच वर्षांत जेवढे जमले तेवढे काम केले. जी कामे राहिली असतील, ती कामे आता पुढे करून दाखवेन फक्त मलाच मत द्या, असे विनवीत आहेत. काही स्वयंघोषितांनी आपणच नगरसेवक होणार अशा आशयाचे फलक वाहनांवर व कार्यालयाबाहेर लावले आहेत. जागोजागी जनसंपर्क कार्यालये थाटून ठेवली असली, तरी कार्यालये मात्र ओस आहेत.गल्लीबोळातील डांबरी रस्ते चकाचक झाले. अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. पण काही ठिकाणच्या जुनाट समस्या ‘जैसे थे’ आहेत. पालिकेचे रुग्णालय नाही, क्रीडांगण नाही, काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये नाहीत. आवश्यक तेथे गतिरोधक नाहीत. मरणारे मरतात, सिग्नल नाहीत. अवैध दारू विक्री,अवैध प्रवासी वाहतूक, ससेहोलपट, ड्रेनेज समस्या कधी सुटणार, या विवंचनेत मतदार आहेत.