शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर जाण्याऐवजी मुख्यमंत्री माधुरी दीक्षितकडे गेले- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 18:54 IST

सत्तेची गुर्मी दाखवू नका, विरोधी पक्ष नेहमीच सत्तेपासून दूर राहत नाही हे लक्षात ठेवा, असा खरमरीत इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे.

पुणे : सत्तेची गुर्मी दाखवू नका, विरोधी पक्ष नेहमीच सत्तेपासून दूर राहत नाही हे लक्षात ठेवा, असा खरमरीत इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. 6 जूनला शिवराज्याभिषेक राज्यात साजरा होत असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्यमंत्री त्यांच्या सरकारने 4 वर्षांत केलेल्या कामगिरीचे कौतुक करणारे पुस्तक घेऊन माधुरी दीक्षितकडे गेले. परंतु छत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाला भाजपाचे कावळे माधुरी दीक्षितकडे गेल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या 19व्या वर्धापन दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या समारोप सभेत ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, आज राष्ट्रवादीची सभा आहे म्हणून नेटवर्क बंद करण्यात आले आहे. भाजपा रडीचा डाव खेळत आहे. भाजपच्या पराभवासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. सध्या समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. आतापर्यंत पंतप्रधान परदेशात जायचे आता मुख्यमंत्री परदेशात गेले आहेत. 

भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार होत आहेत. कोणावरही वचक राहिलेला नाही. भुजबळ यांच्यावर नुसते आरोप झाले म्हणून त्यांना 26 महिने तुरुंगात टाकलं, कायदा हे सांगत नाही. राज्यात 1400 शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. राज्याभिषेकदिनी रायगडावर जाण्याऐवजी मुख्यमंत्री माधुरीला भेटायला गेले. राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी संपावर जातायेत. या पुढे राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल. सर्व महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करू, असंही अजित पवार म्हणाले आहेत. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार