शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर जाण्याऐवजी मुख्यमंत्री माधुरी दीक्षितकडे गेले- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 18:54 IST

सत्तेची गुर्मी दाखवू नका, विरोधी पक्ष नेहमीच सत्तेपासून दूर राहत नाही हे लक्षात ठेवा, असा खरमरीत इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे.

पुणे : सत्तेची गुर्मी दाखवू नका, विरोधी पक्ष नेहमीच सत्तेपासून दूर राहत नाही हे लक्षात ठेवा, असा खरमरीत इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. 6 जूनला शिवराज्याभिषेक राज्यात साजरा होत असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्यमंत्री त्यांच्या सरकारने 4 वर्षांत केलेल्या कामगिरीचे कौतुक करणारे पुस्तक घेऊन माधुरी दीक्षितकडे गेले. परंतु छत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाला भाजपाचे कावळे माधुरी दीक्षितकडे गेल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या 19व्या वर्धापन दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या समारोप सभेत ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, आज राष्ट्रवादीची सभा आहे म्हणून नेटवर्क बंद करण्यात आले आहे. भाजपा रडीचा डाव खेळत आहे. भाजपच्या पराभवासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. सध्या समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. आतापर्यंत पंतप्रधान परदेशात जायचे आता मुख्यमंत्री परदेशात गेले आहेत. 

भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार होत आहेत. कोणावरही वचक राहिलेला नाही. भुजबळ यांच्यावर नुसते आरोप झाले म्हणून त्यांना 26 महिने तुरुंगात टाकलं, कायदा हे सांगत नाही. राज्यात 1400 शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. राज्याभिषेकदिनी रायगडावर जाण्याऐवजी मुख्यमंत्री माधुरीला भेटायला गेले. राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी संपावर जातायेत. या पुढे राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल. सर्व महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करू, असंही अजित पवार म्हणाले आहेत. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार