शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

रासायनिक पाण्याच्या स्त्रोतांची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ...

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर तहसीलदारांना या दूषित पाण्याच्या स्त्राेतांची पाहणी करण्याचा मुहूर्त मिळाला. शुक्रवारी तहसीलदार संजय पाटील यांनी पाहणी करून प्रदूषण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ व सामूहिक सांडपाणी प्रशासन यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीला त्वरित थांबवण्याची ग्वाही दिली आहे

गेली अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या, प्रदूषण मंडळ व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्या आश्वासनाला व भूलथापांना बळी न पडता परिसरातील शेतकऱ्यांनी थेट त्यांच्या शेतात येणाऱ्या पाण्याला मुरुमाच्या साहाय्याने बुजवून दूषित पाणी अडवले. त्यामुळे एरवी ओढ्या, नाल्यातून वाहणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याची वाट बंद झाल्याने पाणी थेट पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर जमा झाले. परिणामी वाहतुकीला येणाऱ्या अडचणी व रस्त्यावर जमा झालेल्या रासायनिक दूषित पाण्याने शेवटी प्रशासनाला जागे करून सोडले. याबाबत अनेक दिवसांपासून लेखी व तोंडी तक्रारी करून देखील काहीच कारवाई होत नसल्याचे दिसून आल्यावर ग्रामप्रशासनाला स्वतःहून पुढे येऊन ज्या कंपन्या रासायनिक दूषित पाणी सोडत आहेत, अशा कंपन्यांच्या पाण्याच्या चाऱ्या बंद कराव्या लागल्या. या कारवाईमुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यस्थेच्या समस्येने प्रशासनाला ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी व बैठक घ्यावी लागली. या वेळी तहसीलदार संजय पाटील, प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे, औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता विजय पेटकर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अधिकारी नरसिंग थोरात, सरपंच राहुल भोसले, माजी उपसरपंच सुनील पवार, आयुब शेख, शेतकरी रोहित कुलंगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीला त्वरित थांबवण्याची ग्वाही दिली आहे. तर प्रदूषण मंडळानेदेखील दूषित पाणी सोडणाऱ्या कंपनी मालकांवर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने हे पाणी त्वरित उचलून घेणे सुरू केले असून, यावर पुढील पंधरा ते वीस दिवसांत तोडगा काढून पुन्हा बैठक घेण्याबाबत निर्देश तहसीलदारांनी तत्सम विभागांना दिले आहेत.

कोरोनाच्या महामारीत अनेक औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या आडून बऱ्याच अन्य कंपनी व्यवस्थापनाने दूषित रासायनिक पाणी राजरोसपणे उघड्यावर सोडण्याचा सपाट लावला आहे. परिणामी दिवसेंदिवस प्रदूषणाच्या समस्या वाढत जाऊन शेवटी ग्रामस्थांच्या घराजवळ पोहचल्या आहेत. याबाबत त्वरित काही कंपन्यांवर कारवाई करीत अन्य कंपन्यांचा शोध पुढील पंधरा दिवसांत घेणार असल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे अधिकारी नितीन शिंदे यांनी दिली आहे.

२१ कुरकुंभ

पुणे-सोलापूर महामार्गावर आलेल्या रासायनिक दूषित पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करताना प्रशासकीय अधिकारी.