शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

रासायनिक पाण्याच्या स्त्रोतांची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ...

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर तहसीलदारांना या दूषित पाण्याच्या स्त्राेतांची पाहणी करण्याचा मुहूर्त मिळाला. शुक्रवारी तहसीलदार संजय पाटील यांनी पाहणी करून प्रदूषण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ व सामूहिक सांडपाणी प्रशासन यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीला त्वरित थांबवण्याची ग्वाही दिली आहे

गेली अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या, प्रदूषण मंडळ व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्या आश्वासनाला व भूलथापांना बळी न पडता परिसरातील शेतकऱ्यांनी थेट त्यांच्या शेतात येणाऱ्या पाण्याला मुरुमाच्या साहाय्याने बुजवून दूषित पाणी अडवले. त्यामुळे एरवी ओढ्या, नाल्यातून वाहणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याची वाट बंद झाल्याने पाणी थेट पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर जमा झाले. परिणामी वाहतुकीला येणाऱ्या अडचणी व रस्त्यावर जमा झालेल्या रासायनिक दूषित पाण्याने शेवटी प्रशासनाला जागे करून सोडले. याबाबत अनेक दिवसांपासून लेखी व तोंडी तक्रारी करून देखील काहीच कारवाई होत नसल्याचे दिसून आल्यावर ग्रामप्रशासनाला स्वतःहून पुढे येऊन ज्या कंपन्या रासायनिक दूषित पाणी सोडत आहेत, अशा कंपन्यांच्या पाण्याच्या चाऱ्या बंद कराव्या लागल्या. या कारवाईमुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यस्थेच्या समस्येने प्रशासनाला ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी व बैठक घ्यावी लागली. या वेळी तहसीलदार संजय पाटील, प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे, औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता विजय पेटकर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अधिकारी नरसिंग थोरात, सरपंच राहुल भोसले, माजी उपसरपंच सुनील पवार, आयुब शेख, शेतकरी रोहित कुलंगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीला त्वरित थांबवण्याची ग्वाही दिली आहे. तर प्रदूषण मंडळानेदेखील दूषित पाणी सोडणाऱ्या कंपनी मालकांवर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने हे पाणी त्वरित उचलून घेणे सुरू केले असून, यावर पुढील पंधरा ते वीस दिवसांत तोडगा काढून पुन्हा बैठक घेण्याबाबत निर्देश तहसीलदारांनी तत्सम विभागांना दिले आहेत.

कोरोनाच्या महामारीत अनेक औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या आडून बऱ्याच अन्य कंपनी व्यवस्थापनाने दूषित रासायनिक पाणी राजरोसपणे उघड्यावर सोडण्याचा सपाट लावला आहे. परिणामी दिवसेंदिवस प्रदूषणाच्या समस्या वाढत जाऊन शेवटी ग्रामस्थांच्या घराजवळ पोहचल्या आहेत. याबाबत त्वरित काही कंपन्यांवर कारवाई करीत अन्य कंपन्यांचा शोध पुढील पंधरा दिवसांत घेणार असल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे अधिकारी नितीन शिंदे यांनी दिली आहे.

२१ कुरकुंभ

पुणे-सोलापूर महामार्गावर आलेल्या रासायनिक दूषित पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करताना प्रशासकीय अधिकारी.