शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण बदलाची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी : प्रा.डॉ.सतीश पांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 19:29 IST

सध्या शहरी भागापेक्षा खेड्यात पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता अधिक प्रगल्भ असल्याची जाणवते..

ठळक मुद्दे आरबीएसकडून  ‘अर्थ हिरो’ पुरस्काराने सन्मानितपर्यावरणाचा शाश्वत विकास तेवत ठेवण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत अशा चळवळीत लोकसहभाग वाढविण्याची गरज

पुणे : दिवसेंदिवस पर्यावरणात बदल होत आहे. आसपासचे वन्य,प्राणीजीवन यावर त्याचा आमुलाग्र परिणाम होत आहे. या सगळयात पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत अशा चळवळीत लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे आता लोक त्यात यायला तयार आहेत. मात्र, त्याकरिता त्यांच्यापर्यंत पोहचण्यची आवश्यकता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देत त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधावा लागेल, असे मत पक्षीतज्ञ, पर्यावरणप्रेमी प्रा.डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले. आरबीएस (रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड) कंपनीचे इनोव्हेशन आणि ऑपरेशन केंद्र असलेल्या आरबीएस इंडिया कंपनीने यांच्यावतीने इला फाऊंडेशनला नुकतेच  ‘अर्थ हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक डॉ. पांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार सोहळा दिल्लीत पार पडला. यानिमित्ताने संवाद साधण्यासाठी व पुरस्काराविषयीची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आरबीएस फाऊंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरबीएस इंडियाचे सस्टेनिबिलीटी प्रमुख एन. सुनील उपस्थित होते. पांडे म्हणाले, आगामी काळात लहान मुले, तरुण यांना डोळ्यासमोर ठेऊन पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमांची मांडणी करावी लागेल. सध्या शहरी भागापेक्षा खेड्यात पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता अधिक प्रगल्भ असल्याची जाणवते. ती आणखी जोपासण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. डॉ. पांडे यांनी नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत एका पर्यावरणविषयासंबंधी सामंजस्य करार केला आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांना माती, पाणी, याबरोबरच सेंद्रीय, असेंद्रीय रसायने त्याचा होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यात येणार आहे.  तापमानात झालेला बदल, त्याचा दैनंदिन जीवनमानावर होणारा परिणाम तसेच पर्यावरणातील विविध घटकांचा होणारा -हास या गोष्टी पुरस्कारात विचारात घेतल्या जातात.  पर्यावरणाबाबत गांभीर्याने विचार करुन नवीन काही घडवू पाहणा-यांना बळ देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. यासाठी केवळ जंगलेच नव्हे तर दुर्गम भागातील खेड्यापर्यत पोहचून तेथील पर्यावरण समजून घेण्याकरिता सहकार्य केले जाते. गतिमान विज्ञान तंत्रज्ञानाची पावले ओळखुन पर्यावरणाचा शाश्वत विकास तेवत ठेवण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येते, असे एन. सुनील यांनी या वेळी सांगितले. 

* आरबीएस अर्थ हिरोज पुरस्कार 2019 चे विजेतेविजेते                          ठिकाण                           पुरस्कार विभाग 

प्रमिला बिसोई             ओडिशा                                जीवन गौरव भुलो अबरार खान         राजस्थान                           ग्रीन वॉरियर दिम्बेश्वर दास             आसाम                         ग्रीन वॉरियर ऐश्वर्या माहेश्वरी          उत्तरप्रदेश                       सेव द स्पेशिजएस सतीश                  तामिळनाडू                    सेव द स्पेशिजजलाल उद दीन बाबा    काश्मिर                        इन्स्पायर

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण