शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

पर्यावरण बदलाची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी : प्रा.डॉ.सतीश पांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 19:29 IST

सध्या शहरी भागापेक्षा खेड्यात पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता अधिक प्रगल्भ असल्याची जाणवते..

ठळक मुद्दे आरबीएसकडून  ‘अर्थ हिरो’ पुरस्काराने सन्मानितपर्यावरणाचा शाश्वत विकास तेवत ठेवण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत अशा चळवळीत लोकसहभाग वाढविण्याची गरज

पुणे : दिवसेंदिवस पर्यावरणात बदल होत आहे. आसपासचे वन्य,प्राणीजीवन यावर त्याचा आमुलाग्र परिणाम होत आहे. या सगळयात पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत अशा चळवळीत लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे आता लोक त्यात यायला तयार आहेत. मात्र, त्याकरिता त्यांच्यापर्यंत पोहचण्यची आवश्यकता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देत त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधावा लागेल, असे मत पक्षीतज्ञ, पर्यावरणप्रेमी प्रा.डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले. आरबीएस (रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड) कंपनीचे इनोव्हेशन आणि ऑपरेशन केंद्र असलेल्या आरबीएस इंडिया कंपनीने यांच्यावतीने इला फाऊंडेशनला नुकतेच  ‘अर्थ हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक डॉ. पांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार सोहळा दिल्लीत पार पडला. यानिमित्ताने संवाद साधण्यासाठी व पुरस्काराविषयीची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आरबीएस फाऊंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरबीएस इंडियाचे सस्टेनिबिलीटी प्रमुख एन. सुनील उपस्थित होते. पांडे म्हणाले, आगामी काळात लहान मुले, तरुण यांना डोळ्यासमोर ठेऊन पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमांची मांडणी करावी लागेल. सध्या शहरी भागापेक्षा खेड्यात पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता अधिक प्रगल्भ असल्याची जाणवते. ती आणखी जोपासण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. डॉ. पांडे यांनी नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत एका पर्यावरणविषयासंबंधी सामंजस्य करार केला आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांना माती, पाणी, याबरोबरच सेंद्रीय, असेंद्रीय रसायने त्याचा होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यात येणार आहे.  तापमानात झालेला बदल, त्याचा दैनंदिन जीवनमानावर होणारा परिणाम तसेच पर्यावरणातील विविध घटकांचा होणारा -हास या गोष्टी पुरस्कारात विचारात घेतल्या जातात.  पर्यावरणाबाबत गांभीर्याने विचार करुन नवीन काही घडवू पाहणा-यांना बळ देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. यासाठी केवळ जंगलेच नव्हे तर दुर्गम भागातील खेड्यापर्यत पोहचून तेथील पर्यावरण समजून घेण्याकरिता सहकार्य केले जाते. गतिमान विज्ञान तंत्रज्ञानाची पावले ओळखुन पर्यावरणाचा शाश्वत विकास तेवत ठेवण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येते, असे एन. सुनील यांनी या वेळी सांगितले. 

* आरबीएस अर्थ हिरोज पुरस्कार 2019 चे विजेतेविजेते                          ठिकाण                           पुरस्कार विभाग 

प्रमिला बिसोई             ओडिशा                                जीवन गौरव भुलो अबरार खान         राजस्थान                           ग्रीन वॉरियर दिम्बेश्वर दास             आसाम                         ग्रीन वॉरियर ऐश्वर्या माहेश्वरी          उत्तरप्रदेश                       सेव द स्पेशिजएस सतीश                  तामिळनाडू                    सेव द स्पेशिजजलाल उद दीन बाबा    काश्मिर                        इन्स्पायर

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण