शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

सणवारात महागाईचा वाढला तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST

अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याच काळात दरवर्षी ...

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याच काळात दरवर्षी खाद्यतेल, भाजीपाला, फळभाज्यांचे भाव वाढत असतात. यंदा तर दरवाढीचा कहर झाला आहे. खाद्यतेलाचे दर दुप्पटीहून वाढले आहेत, तर गॅसचे दर महिन्याला वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यांत गॅसचे दर ६०-६५ रुपयांनी (वर्षभरात २६०-२६५ रुपये) वाढले आहेत. सोबतीला साखर ४०-४२ किलोपर्यंत पाेहोचल्याने सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीला आले आहेत.

सध्या प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहे. तेल, साखर, गॅस या प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आहेत. सोबतीला दैनंदिन भाजीपाला, फळभाज्या आवश्यक आहे. या सर्वांचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, याबाबत राज्य असो की केंद्र सरकार दोघेही दुर्लक्ष करत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे त्यांना काही पडले नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया गृहिणी देत आहेत. या महागाईचा सर्वात जास्त फटका गृहिणींना बसत आहे. घरसंसार चालवताना अक्षरशा त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

--------

कोरोनाकाळात आमचे रोजगार गेले आहे. गॅसचे दर दर महिन्याला वाढत आहे. केंंद्र सरकारने सबसिडी बंद केली आहे. साथीला वर्षभरापासून तेलाचे दर दुप्पट झाले आहेत. त्यातच आता भाजीपालाचे दरही सातत्याने वाढत आहेत. गरिबांच्या जगण्या-मरण्याचा शासनाला काही घेणं-देणं नसल्याचे हे द्योतक आहे, असेच आम्हाला आता वाटायला लागले आहे.

- मोहिनी साबळे, गृहिणी

-----

होलसेल बाजारातील परिस्थिती वेगळी असते. मात्र, किरकोळ बाजारातील छोठे-मोठे व्यापारी पाऊस, मालाची आवक कमी असल्याचे सांगून प्रचंड भाववाढ करतात. वेगवेगळ्या कारणामुळे प्रत्येकाला होलसेल बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करता येत नाही. कोरोनामुळे वर्षभरापासून आर्थिक स्थिती बेताचीच झाली आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सर्वसामान्यांनी कसे जगायचे.

- नंदा ढवळे, गृहिणी

-----

१४ आणि १५ ऑगस्टला जोडून सुटी आल्याने मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशी भाजीपाल्याची आवक दुप्पट झाली होती. तेव्हा दर निम्म्याने उतरल्याने चांगले दरही मिळू शकले नाहीत. आम्हाला व्यापाऱ्यांकडून अपेक्षित दर मिळत नाही. किरकोळ व्यापारी मात्र शहराच्या विविध भागांत घेतलेल्या भावापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने मालाची विक्री करत आहेत. पिकवणाऱ्याचा उत्पादन आणि वाहतूकखर्चही निघत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती कधी बदलणार आहे.

- प्रताप कदम, शेतकरी

------

फळभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो)

वाण मार्केट यार्डातील दर इतर ठिकाणचे दर

वाटाणा ७०-७५ १००-१२०

गवार ४०-५० ६०-७५

वांगी १८-२२ ३५-४०

फ्लावर १२-१४ २०-२५

दोडका १०-१४ २२-२८

भेंडी १०-१६ २५-३०

चवळी १६-२० २०-३०

कोबी ४-६ २०-२५

टोमॅटो ६-८ १५-२५

काकडी ८-१० १५-२२

दुधी ५-८ १५-२०

कांदा १८-२२ २५-३०

बटाटा १०-१४ २०-२५

-----

...असे वाढले गॅसचे दर

महिना दर (रुपये)

ऑगस्ट २०२० ६१०

डिसेंबर २०२० ६६१

फेब्रुवारी २०२१ ७३८

एप्रिल २०२१ ८३१

मे २०२१ ८१२

ऑगस्ट २०२१ ८७५