शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

भारताची राजकीय संस्कृती विकृतीने भरलेली  डॉ. श्रीपाल सबनीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 5:16 PM

भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने जेष्ठ परिवर्तनवादी नेते भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी भाई वैद्य स्मृती पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर व रिपब्लिकन युवा मोर्च्याच्या अध्यक्षा सुवर्णाताई  डंबाळे यांना डॉ. श्रीपाल सबनीस ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे : विश्वाची सांस्कृतिक प्रगल्भता सत्ताधाऱ्यांपेक्षा महापुरुष महात्मांनी वाढवली. सत्ता ही मुलतः भ्रष्ट असते म्हणूनच पक्षीय सत्तेचे राजकारण कोणालाही करू द्यावे. पण जनतेने मात्र विवेकशील बनून सत्याचे व सेवेचे समाजकारण करावे. भाई वैद्य यांचे जीवन ह्या संदर्भात आदर्श होते. भारताची राजकीय संस्कृती विकृतीने भरली असून लोकशाही समाजवाद धोक्यात असल्याचे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने जेष्ठ परिवर्तनवादी नेते भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी भाई वैद्य स्मृती पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर व रिपब्लिकन युवा मोर्च्याच्या अध्यक्षा सुवर्णाताई  डंबाळे यांना डॉ. श्रीपाल सबनीस ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, तिरंगी शाल, संविधान प्रत असे आहे. ह्यावेळी व्यासपीठावर डॉ. अभिजित वैद्य, लताताई राजगुरू, विठ्ठल गायकवाड, विकास आबनावे आदी उपस्थित होते. 

भाईंच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. सबनीस  म्हणाले  की, भाई राजकारण, समाजकारण संस्कृतीचे संचित होते, आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. भारताच्या आजच्या उदासीनता पसरवणाऱ्या राजकारणात भाईंच्या विचारांची आमूलाग्र गरज आहे. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर राहुल डंबाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPoliticsराजकारणcultureसांस्कृतिक