शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

 देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:25 IST

दलित-आदिवासी संघटनांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाविरोधात पुकारलेल्या भारत बंदचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.

ठळक मुद्दे देशात अस्वस्थतेची स्थिती असून सध्या एकही नेता हा लोकनेता राहिला नाही.सध्याच्या स्थितीस न्यायालय आणि केंद्र शासन जबाबदार

देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही : प्रकाश आंबेडकरपुणे: सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) विसंगत निर्णय दिला असून त्यावर केंद्र शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे सोमवारी दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र शासन जबाबदार असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच भाजप नेत्यांकडून राज्यघटनेत बदल आणि आरक्षण संपविण्याची चर्चा केली जात असल्याने समाजात अस्वस्थता वाढत चालली आहे.त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विसंगत निर्णयाची भर पडली आहे, असेही मत आंबेडकर यांनी सोमवारी व्यक्त केले .दलित-आदिवासी संघटनांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाविरोधात पुकारलेल्या भारत बंदचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. या प्रसंगी भारिप-बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष म.ना.कांबळे उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने एससी,एसटी संवर्गाला क्रिमिलियर का लागू शकत नाही.याबाबत केंद्र शासनाला भूमिका मांडण्यास सांगितले आहे.पूर्वी सर्वोच्च न्यायालय हेच एक विश्वासाने ठिकाण होते.मात्र,न्यायालयाकडून विसंगत निर्णय दिले जात असल्याने लोक रस्त्यावर उतरून राग व्यक्त करत आहेत. देशात अस्वस्थतेची स्थिती असून सध्या एकही नेता हा लोकनेता राहिला नाही. प्रत्येक नेता हा एका जाती पुरता मर्यादित झाला आहे. त्यामुळे देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही.आंबेडकर म्हणाले, एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणा-या अधिका-यांवर गुन्हे दाखल करा, असे निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात दिलेला निर्णय हा या निर्णयाशी पूर्णपणे विसंगत आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार दाखल झाल्यास प्रथम त्याची शहानिशा करून त्यात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर अनुसूचित जाती-जमातींना क्रिमिलेयर लागू करू शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा पूवीर्चा निर्णय असतानाच आता पुन्हा न्यायालयाने याबाबत सरकारला भूमिका मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे दलित-आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.न्यायालयाने दिलेल्या विसंगत निर्णयांविरोधात सोशल मीडियावरून भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्याचे पडसाद उत्तर भारतासह इतर काही राज्यात पडसाद उमटलेले आहेत. अ‍ॅट्रॉसिटीबाबतच्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी एनडीए घटकपक्षांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे केली होती. मात्र,त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीस न्यायालय आणि केंद्र शासन जबाबदार आहे.,असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBJPभाजपा