शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

भारत ‘ बिनडोक’ लोकांचा देश आहे : अ‍ॅड. असीम सरोदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 21:27 IST

समाजाचं डोकं ठिकाणावर असेल तर काय चांगलं काय वाईट हे समजेल.

पुणे : भारत हा ‘बिनडोकं’ लोकांचा देश आहे. लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरचं नव्हे तर संविधानही कळलेले नाही. त्यांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्यही उमजलेले नाही. नथुराम गोडसे नाटक यायला हवं. मोदींवरचा चित्रपट आणि ‘अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारखे चित्रपट देखील यायला हवेत. समाजाचं डोकं ठिकाणावर असेल तर काय चांगलं काय वाईट हे समजेल. त्यामुळे चित्रपटांवरची ‘सेन्सॉरशीप’ ही बंद झाली पाहिजे, असे परखड मत मानव अधिकार विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. मुक्तांगण फाऊंडेशनच्या दुस-या वर्धापनदिनानिमित्त आयोजित  प्रेरणा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी  फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण कांबळे, उपाध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.सरोदे म्हणाले, पूर्वी संवेदनशील विषयांमधून समाजामध्ये जनजागृती केली जात होती. त्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यमं होतं. मात्र आज चित्रपटांमधून प्रतिकात्मकता बदलण्यावर भर दिला जात आहे. चित्रपटांमध्ये शिवी वगैरे चालत नाही. समाजातील भाषा चित्रपटांमध्ये वापरण्यावर आक्षेप घेतला जातो. सेन्सॉर बोर्डाच्या नावाखाली चित्रपट दडपले जात आहेत. घटनाबाहय सत्ताकेंद्र निर्माण होत आहेत. त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुक्त असायला हवं. 2014 च्या निवडणूकीत वाईट संदेश, चित्र दिसले हे कुणी सुरू केले हे सर्वांना माहिती आहे. आता इतर कुणी या गोष्टी केल्या तर कारवाई का होते? आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागत असलेला समाज विकसनशील असतो. मानवी प्रतिष्ठेसह सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. नथुराम गोडसे यावर नाटक येत असलं तर ते यायला हवं. अशा गोष्टींमुळे गोडसे महान होत नाहीत. 

टॅग्स :PuneपुणेAsim Sarodeअसिम सराेदेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदी