शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

भारत माणुसकीत मागासलेला : डॉ. बाबा आढाव : अग्निपुष्प पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:58 AM

देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्दे माणसाने आपले विचार शुद्ध करायला हवेत : बाबा आढाव आताचा भारत सत्तामेव जयते यासंकल्पेनेने चालू आहे : माधव तुटकणे

पुणे : भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या स्थानावर आहे. पण वास्तवाचा विचार केला तर माणुसकीच्या बाबत देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल माधव तुटकणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या मेजर जनरल माधुरी कानिटकर, अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी, कर्नल अरविंद कुशवाह, लेखिका मीनाक्षी कुमकर आदी उपस्थित होते. आढाव म्हणाले, ‘‘आपल्या मानवी जीवनात माणुसकीचा विचार फारच कमी प्रमाणात केला जात आहे. माणसाने आपले विचार शुद्ध करायला हवेत. तणावातून मार्ग काढले तर मृत्यूला परत पाठवून मानवी जीवनाला जीवनदान मिळू शकते. कानिटकर म्हणाल्या, ‘‘ या पुस्तकाचे काम चालू असताना मीनाक्षी बरोबर आदिवासी भाग, गोरगरीब लोकांची ठिकाणे फिरले तेव्हाच मला माणुसकीचा खरा अर्थ कळला. प्रत्येक रुग्णाला माणूस म्हणून पाहू लागले. माधव तुटकणे म्हणाले, आपण नेहमी सत्यमेव जयते म्हणतो पण आताचा भारत सत्तामेव जयते यासंकल्पेनेने चालू आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे तर छान होईल आणि हे या पुस्तकातून पाहायला मिळते.मीनाक्षी कुमकर म्हणाल्या, मी एक समाज कार्यकर्ती आहे या पुस्तकात साहित्यिक गोष्टी नाहीत तर समृद्ध वाचनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत. हे पुस्तक वाचून मनुष्याला जीवनातील वेदना, व्याधी संपुष्टात आणण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावPuneपुणे