शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

इंदापूरचा ३० वर्षांपासून धगधगणारा पाणीप्रश्न पुन्हा ‘जैसे थे ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

(सतीश सांगळे) लोकमत न्यूज नेटवर्क कळस: इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांनी बारमाही पाणीप्रश्नांबाबत लढा देऊनही ...

(सतीश सांगळे)

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस: इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांनी बारमाही पाणीप्रश्नांबाबत लढा देऊनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहणार आहे.

नीरा डावा कालव्यावरील अंथुर्णेपासून शेटफळ हवेलीपर्यंत बावीस गावांच्या शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला. यामधून नीरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येऊन शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदायासमोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना उसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्षे पूर्ण झाली, तरी २२ गावांतील पाणीप्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले. त्या वेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली. विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणीनंतर कायम स्वरूपी योजना मंजूर करावी, अशी शिफारस झाली. त्यामुळे एकरी १५ गुंठ्यांऐवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नासाठी मोठी ताकद लावून उजनी धरणावरून ५ टीएमसी पाणी मंजूर केले. मात्र, सोलापूरमधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव, निमसाखर, रेडणी, निमगाव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी या गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे. मूळच्या अध्यादेशाप्रमाणे सणसर कटव्दारे मिळणारे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

——————————————

खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभी राहिल्यानंतर, २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगाव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते. मात्र, आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतु अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात खासदारांनी ताकद दिली नाही. तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात पक्षासाठी सोयीची भूमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

चौकट

खडकवासला कालव्यावरून नीरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरुवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, काही राजकारणीच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला. त्यावेळेपासून राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला वरदान ठरण्याऐवजी शापित ठरला आहे.