शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरचा ३० वर्षांपासून धगधगणारा पाणीप्रश्न पुन्हा ‘जैसे थे ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

(सतीश सांगळे) लोकमत न्यूज नेटवर्क कळस: इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांनी बारमाही पाणीप्रश्नांबाबत लढा देऊनही ...

(सतीश सांगळे)

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस: इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांनी बारमाही पाणीप्रश्नांबाबत लढा देऊनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहणार आहे.

नीरा डावा कालव्यावरील अंथुर्णेपासून शेटफळ हवेलीपर्यंत बावीस गावांच्या शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला. यामधून नीरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येऊन शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदायासमोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना उसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्षे पूर्ण झाली, तरी २२ गावांतील पाणीप्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले. त्या वेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली. विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणीनंतर कायम स्वरूपी योजना मंजूर करावी, अशी शिफारस झाली. त्यामुळे एकरी १५ गुंठ्यांऐवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नासाठी मोठी ताकद लावून उजनी धरणावरून ५ टीएमसी पाणी मंजूर केले. मात्र, सोलापूरमधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव, निमसाखर, रेडणी, निमगाव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी या गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे. मूळच्या अध्यादेशाप्रमाणे सणसर कटव्दारे मिळणारे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

——————————————

खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभी राहिल्यानंतर, २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगाव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते. मात्र, आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतु अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात खासदारांनी ताकद दिली नाही. तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात पक्षासाठी सोयीची भूमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

चौकट

खडकवासला कालव्यावरून नीरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरुवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, काही राजकारणीच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला. त्यावेळेपासून राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला वरदान ठरण्याऐवजी शापित ठरला आहे.