शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:07 IST

गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली.

इंदापूर - गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली. पाण्याच्या टाकीची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना, पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींनी अद्यापपर्यंत या समस्येची दखल घेतली नसल्याविषयी त्यांनी तीव्रद नापसंती व्यक्त केली.सविस्तर हकिगत अशी की, उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर नगर परिषदेच्या माळवाडी नं.२ येथील नळपाणी पुरवठा योजनेतून संपूर्ण दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून पिवळसर तवंग असणारे दुर्गंधीयुक्त गाळमिश्रित पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. हे पाणी प्यायल्यामुळे पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.पत्रकारांशी बोलताना पोपट शिंदे व श्रीधर बाब्रस यांनी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, सत्ताधारी गटाने अद्यापपर्यंत त्यावर उपाययोजना केलेली नाही. पाणीपुरवठा समितीच्या सभापती मनीषा शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागाची भेट घेऊन चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे नाही, हे स्पष्ट दिसत आहे. अजून उन्हाळ्यास सुरुवात झाली नाही, तोपर्यंतच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गलथान कारभारामुळे संपूर्ण उन्हाळा पार पडेपर्यंत निभाव कसा लागणार, अशी शंका व्यक्त करून, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मिटला नाही तर आम्ही नगर परिषदेच्या ढिसाळ कामाच्या निषेधार्थ नागरिकांसह रस्त्यावर येऊ, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. माळवाडी नं.२ येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात असणाºया जलपर्णी व इतर झाडांच्या लगतचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी वापरावे लागत आहे.या झाडांच्या वासामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे.नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग पाणी शुद्धीकरणाबाबत कसलाही हलगर्जीपणा करत नाही.सध्या पीएसी पावडर,क्लोरिन, ब्लिचिंग पावडर व बेन्टोनाईट पावडरचा शुद्धीकरणासाठी वापर होत आहे. बेन्टोनाईट पावडरचा साठा संपला होता. मात्र बारामतीहून दोन टन पावडर आणण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अंकुश बोराटे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी