शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

इंदापूरकरांची पोटदुखी वाढली, आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:07 IST

गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली.

इंदापूर - गेल्या आठवड्यापासून इंदापूर नगर परिषदेकडून पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांकडून पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी सोमवारी (दि.५) नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास भेट दिली. पाण्याच्या टाकीची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना, पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींनी अद्यापपर्यंत या समस्येची दखल घेतली नसल्याविषयी त्यांनी तीव्रद नापसंती व्यक्त केली.सविस्तर हकिगत अशी की, उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर नगर परिषदेच्या माळवाडी नं.२ येथील नळपाणी पुरवठा योजनेतून संपूर्ण दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून पिवळसर तवंग असणारे दुर्गंधीयुक्त गाळमिश्रित पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. हे पाणी प्यायल्यामुळे पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.पत्रकारांशी बोलताना पोपट शिंदे व श्रीधर बाब्रस यांनी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, सत्ताधारी गटाने अद्यापपर्यंत त्यावर उपाययोजना केलेली नाही. पाणीपुरवठा समितीच्या सभापती मनीषा शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागाची भेट घेऊन चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे नाही, हे स्पष्ट दिसत आहे. अजून उन्हाळ्यास सुरुवात झाली नाही, तोपर्यंतच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गलथान कारभारामुळे संपूर्ण उन्हाळा पार पडेपर्यंत निभाव कसा लागणार, अशी शंका व्यक्त करून, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मिटला नाही तर आम्ही नगर परिषदेच्या ढिसाळ कामाच्या निषेधार्थ नागरिकांसह रस्त्यावर येऊ, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. माळवाडी नं.२ येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात असणाºया जलपर्णी व इतर झाडांच्या लगतचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी वापरावे लागत आहे.या झाडांच्या वासामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे.नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग पाणी शुद्धीकरणाबाबत कसलाही हलगर्जीपणा करत नाही.सध्या पीएसी पावडर,क्लोरिन, ब्लिचिंग पावडर व बेन्टोनाईट पावडरचा शुद्धीकरणासाठी वापर होत आहे. बेन्टोनाईट पावडरचा साठा संपला होता. मात्र बारामतीहून दोन टन पावडर आणण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अंकुश बोराटे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी