शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

इंदापूर, सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा; उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:36 IST

न्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत...

इंदापूर (पुणे) : आजअखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून एकूण ३.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे. उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत.

आज अखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. पाण्याचे प्रसार क्षेत्र २७६.२९ चौरस किलोमीटर एवढे नोंदविण्यात आले आहे. पाण्याची पातळी ४९४.५९५ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ९३.१४ टीएमसी एवढा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला पाणीसाठा ५९.६२ टीएमसी होता. टक्केवारी १११.२८ एवढी होती. यंदाच्या वर्षी दि.१९ ते २९ ऑगस्ट दरम्यान उजनी धरणातून ३.८० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार -

येत्या २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी येते आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीला पाणी सोडावे लागणार आहे. जानेवारी महिन्यात माघी यात्रा येत आहे. या दोन्हीही यात्रांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी येत असतात. त्यामुळे चंद्रभागेला पाणी सोडावेच लागणार आहे. आज रोजी धरणात उपलब्ध असणाऱ्या ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यातील थोडासा हिस्सा त्यासाठी खर्ची पडणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश स्थिती दिसून येत आहे. माढा मोहोळ पंढरपूर व सोलापूर भागातून पाण्याची वाढती मागणी होणारच आहे. त्यासाठी उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :DamधरणSolapurसोलापूर