शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

इंदापूर, सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा; उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:36 IST

न्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत...

इंदापूर (पुणे) : आजअखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून एकूण ३.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे. उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत.

आज अखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. पाण्याचे प्रसार क्षेत्र २७६.२९ चौरस किलोमीटर एवढे नोंदविण्यात आले आहे. पाण्याची पातळी ४९४.५९५ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ९३.१४ टीएमसी एवढा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला पाणीसाठा ५९.६२ टीएमसी होता. टक्केवारी १११.२८ एवढी होती. यंदाच्या वर्षी दि.१९ ते २९ ऑगस्ट दरम्यान उजनी धरणातून ३.८० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार -

येत्या २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी येते आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीला पाणी सोडावे लागणार आहे. जानेवारी महिन्यात माघी यात्रा येत आहे. या दोन्हीही यात्रांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी येत असतात. त्यामुळे चंद्रभागेला पाणी सोडावेच लागणार आहे. आज रोजी धरणात उपलब्ध असणाऱ्या ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यातील थोडासा हिस्सा त्यासाठी खर्ची पडणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश स्थिती दिसून येत आहे. माढा मोहोळ पंढरपूर व सोलापूर भागातून पाण्याची वाढती मागणी होणारच आहे. त्यासाठी उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :DamधरणSolapurसोलापूर