शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इंदापूर, सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा; उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:36 IST

न्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत...

इंदापूर (पुणे) : आजअखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून एकूण ३.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे. उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत.

आज अखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. पाण्याचे प्रसार क्षेत्र २७६.२९ चौरस किलोमीटर एवढे नोंदविण्यात आले आहे. पाण्याची पातळी ४९४.५९५ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ९३.१४ टीएमसी एवढा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला पाणीसाठा ५९.६२ टीएमसी होता. टक्केवारी १११.२८ एवढी होती. यंदाच्या वर्षी दि.१९ ते २९ ऑगस्ट दरम्यान उजनी धरणातून ३.८० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार -

येत्या २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी येते आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीला पाणी सोडावे लागणार आहे. जानेवारी महिन्यात माघी यात्रा येत आहे. या दोन्हीही यात्रांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी येत असतात. त्यामुळे चंद्रभागेला पाणी सोडावेच लागणार आहे. आज रोजी धरणात उपलब्ध असणाऱ्या ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यातील थोडासा हिस्सा त्यासाठी खर्ची पडणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश स्थिती दिसून येत आहे. माढा मोहोळ पंढरपूर व सोलापूर भागातून पाण्याची वाढती मागणी होणारच आहे. त्यासाठी उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :DamधरणSolapurसोलापूर