शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

इंदापूर : २२ गावांचा पाणीप्रश्न कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:26 IST

माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला.

लाखेवाडी - माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला. ही बाब लक्षात घेता, इंदापुरातील २२ गावच्या बारमाही प्रश्नाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ ते ३० वर्षे उलटल्यानंतर देखील या २२ गावातील पाणीप्रश्नाची अंमलबजावणी सणसर कटद्वारे झालेली नाही. त्यामुळे ‘पवार साहेब’ तुम्ही इंदापुरातील २२ गावांतही एकदा लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.माण (सातारा) दौºयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असताना त्यांनी वेळेत वेळ काढून वॉटर कप स्पर्धेच्या निमित्त तेथील दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. शिवाय तेथील जलसंधारणाच्या कामासाठी पवार यांनी केवळ एका तासांमध्ये पाच कोटींचा निधी मिळवून दिला. जलसंधारणाच्या कामासाठी सरकारवर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही सुद्धा पवार यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी इंदापुरातील दुष्काळी गावांची पाहणी करावी, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी, वरकुटे, निमगाव केतकी, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, गोतोंडी, खोरोची, चाकाटी, शिरसटवाडी, हगारवाडी, शेळगाव या गावांसह अन्य दक्षिण पट्ट्यातील गावांची दुष्काळी म्हणून ओळख कायम आहे. इंदापुरातील २२ गाव आजही पाण्यासाठी तहानलेली आहेत. विशेष म्हणजे याच बावीस गावच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी ही गावे पाणीदार करण्याचे, आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ वर्ष झाली तरी या २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आल्यानंतरही याच मुद्याचे राजकारण केले गेले. पाणी प्रश्न सुटलाच नाही, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या गावांचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले गेले. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.इंदापुरातील या गावांना मुळच्या ‘जीआर’ प्रमाणे सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळायला हवे. परंतु, पाणीच मिळत नसल्याने २२ गावांच्या हक्काचे पाणी कोठे जाते? याचे कोडे आजपर्यंत या गावातील ग्रामस्थांना उलगडलेले नाही. याच पाणी प्रश्नावर शेतकºयाला आत्महत्या करावी लागली. ज्येष्ठ नेते शरद पवार साताºयातील माण, खटाव तालुक्यात तासाभरात पाच कोंटींचा निधी देतात. तर काही संस्थांकडून देखील निधी उभारला. तसेच इंदापूर तालुक्यातील २२ गावांना भेट देवून पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी या भागातील शेतकरी करीत आहेत.केवळ टँकरने पाणी नको....- इंदापुरातील या २२ गावांतून एप्रिल, मे महिन्यांत टँकरची मागणी ठरलेली असते. यानुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही केला जातो. परंतु, केवळ टँकरचे पाणी देवून तहान भागवण्यापेक्षा पाण्याकरिता ठोस उपाय योजना करावी. शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली लावावा, अशी मागणी तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील गावांतून होऊ लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीnewsबातम्या