शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

इंदापूर : २२ गावांचा पाणीप्रश्न कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:26 IST

माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला.

लाखेवाडी - माण-खटाव तालुक्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसण्याचा प्रयत्न श्रमदानातून होत आहे. त्याकामी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ एका तासात दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला. ही बाब लक्षात घेता, इंदापुरातील २२ गावच्या बारमाही प्रश्नाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ ते ३० वर्षे उलटल्यानंतर देखील या २२ गावातील पाणीप्रश्नाची अंमलबजावणी सणसर कटद्वारे झालेली नाही. त्यामुळे ‘पवार साहेब’ तुम्ही इंदापुरातील २२ गावांतही एकदा लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.माण (सातारा) दौºयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असताना त्यांनी वेळेत वेळ काढून वॉटर कप स्पर्धेच्या निमित्त तेथील दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. शिवाय तेथील जलसंधारणाच्या कामासाठी पवार यांनी केवळ एका तासांमध्ये पाच कोटींचा निधी मिळवून दिला. जलसंधारणाच्या कामासाठी सरकारवर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही सुद्धा पवार यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी इंदापुरातील दुष्काळी गावांची पाहणी करावी, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी, वरकुटे, निमगाव केतकी, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, गोतोंडी, खोरोची, चाकाटी, शिरसटवाडी, हगारवाडी, शेळगाव या गावांसह अन्य दक्षिण पट्ट्यातील गावांची दुष्काळी म्हणून ओळख कायम आहे. इंदापुरातील २२ गाव आजही पाण्यासाठी तहानलेली आहेत. विशेष म्हणजे याच बावीस गावच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी ही गावे पाणीदार करण्याचे, आश्वासन दिले होते. परंतु, आज तब्बल २५ वर्ष झाली तरी या २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आल्यानंतरही याच मुद्याचे राजकारण केले गेले. पाणी प्रश्न सुटलाच नाही, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या गावांचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले गेले. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.इंदापुरातील या गावांना मुळच्या ‘जीआर’ प्रमाणे सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळायला हवे. परंतु, पाणीच मिळत नसल्याने २२ गावांच्या हक्काचे पाणी कोठे जाते? याचे कोडे आजपर्यंत या गावातील ग्रामस्थांना उलगडलेले नाही. याच पाणी प्रश्नावर शेतकºयाला आत्महत्या करावी लागली. ज्येष्ठ नेते शरद पवार साताºयातील माण, खटाव तालुक्यात तासाभरात पाच कोंटींचा निधी देतात. तर काही संस्थांकडून देखील निधी उभारला. तसेच इंदापूर तालुक्यातील २२ गावांना भेट देवून पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी या भागातील शेतकरी करीत आहेत.केवळ टँकरने पाणी नको....- इंदापुरातील या २२ गावांतून एप्रिल, मे महिन्यांत टँकरची मागणी ठरलेली असते. यानुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही केला जातो. परंतु, केवळ टँकरचे पाणी देवून तहान भागवण्यापेक्षा पाण्याकरिता ठोस उपाय योजना करावी. शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली लावावा, अशी मागणी तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील गावांतून होऊ लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीnewsबातम्या