कांदा लागवडीकडे वाढता कल
By Admin | Updated: August 24, 2015 02:50 IST2015-08-24T02:50:06+5:302015-08-24T02:50:06+5:30
सध्या बाजारात कांद्याला असणारा उच्चांकी भाव, पाऊस न झाल्याने भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी, उसाला लागणारे पाणी व त्याचा कालावधी, त्याचबरोबर

कांदा लागवडीकडे वाढता कल
मांडवगण फराटा : सध्या बाजारात कांद्याला असणारा उच्चांकी भाव, पाऊस न झाल्याने भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी, उसाला लागणारे पाणी व त्याचा कालावधी, त्याचबरोबर उसाला हमी भाव नसल्याने शिरूर पूर्व भागातील ऊसपट्ट्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीत मग्न आहे.
सध्या घोडनदी कोरडी पडली असून, तेथील पिके मोठ्या प्रमाणावर जळण्याच्या मार्गावरआहेत. परंतु भीमा नदी ही बारमाही वाहणारी
नदी असून, या नदीवरील कोल्हापुरी बंधारे असल्याने मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, बाभुळसर बु., वडगाव रासाई, सादलगाव, नागरगाव, रांजणगाव सांडस ही गावे येत असून, या गावातील पूर्ण क्षेत्र ओलिताखाली असल्याने कायमस्वरूपी या भागात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु यावर्षी उसाच्या बाजार भावाबाबत शेतकऱ्यामध्ये चिंता वाढल्याने व बाजारात चढ्या भावाने कांदा विक्री होत
असल्याने तसेच यावर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी असल्याने कांद्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटणार असे डोळ्यांसमोर ठेवूनच येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीकडे वळला आहे.
सध्या सर्वत्र जनावरांना चारा नाही. त्यासाठी सरसकरट चाऱ्यासाठी उसाचा उपयोग केला जात आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर खोडवा ऊस गुऱ्हाळाला घालून कांदा लागवड करण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या या भागात दिसत आहे. (वार्ताहर)