शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 10:27 IST

तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला...

पुणे : संपूर्ण राज्यातून आषाढी वारीसाठी जवळपास १२ लाख भाविक सहभागी झाले हाेते. आता आषाढी झाल्यावर भाविक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, पंढरपुरात वारीमध्ये माेठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात आल्याने आता महाराष्ट्रात काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

या आषाढी वारीत आळंदी ते पंढरपूर तसेच देहू ते पंढरपूर या दरम्यान लाखाे वारकरी असतात. ते वारकरी पायी प्रवास करतात. यंदा २० जून ते १० जुलै या तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला. काेराेना प्रादुर्भावातून घातलेल्या निर्बंधामुळे दोन वर्षे वारीच झाली नाही, मात्र त्यानंतर यंदा झालेली वारी ही कोणत्याही निर्बंधांशिवाय आणि सुरक्षेच्या नियमांशिवाय झाली आहे. त्यातच रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

जिल्ह्यांना दिल्या या सूचना...

- तीव्र ताप आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (सर्दी) पसरू नये यावर लक्ष ठेवा

- स्थानिक गरजेनुसार चाचण्यांची संख्या वाढवा

- सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवा

- स्थानिक रुग्णवाढीकडे लक्ष द्या. एखाद्या भागात माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाला कळवावे.

आषाढी वारीतील यात्रेकरू त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर काेरोनाची थाेडी रुग्णवाढ हाेण्याची शक्यता आहे. खासकरून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही संख्या वाढली तरी येत्या दहा-पंधरा दिवसांत रुग्ण संख्या वाढून परत पूर्वस्थिती येईल.

- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022