शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवा, लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 01:45 IST

देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. याबाबत उदाहरण देताना अहवालात म्हटले आहे की, राज्यात प्रति एक हजार व्यक्तीमागे केवळ १८४ रुग्णभरती क्षमता आहे.

निनाद देशमुख।

पुणे : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आलेला १४ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवून ३ मेपर्यंत केला आहे; मात्र देशातील वैद्यकीय संसाधने बघता लॉकडाऊन ३० जूनपर्य$ंत वाढवावा; तसेच देशातील व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात यावी, असा निष्कर्ष पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील ‘आएएनएस अश्विनी’ या नौदलाच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून काढला आहे.

देशात ‘कोव्हिड-१९’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील अनेक संस्था ‘कोरोना’वर लस शोधत आहेत. या समस्येचा सामना कसा करावा आणि त्यावर काय उपाय योजावे, यावर पुण्यातील लष्करी महाविद्यालय आणि मुंबईतील ‘आयएनएस अश्विनी’ या नौदलाच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे ‘मॅथेमॅटिक्स मॉडेलिंग आॅफ पोस्ट लॉकडाऊन’ हा संयुक्त अभ्यास करण्यात आला. ‘आयएनएस अश्विनी’तर्फे डॉ. कौस्तुक चॅटर्जी, तर एएफएमसीतर्फे डॉ. कौशिक चॅटर्जी, डॉ. अरुण यादव आणि डॉ. शंकर सुब्रह्मण्यम यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासानुसार सध्याची परिस्थिती पाहता आता असलेला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्याची गरज आहे. जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही व त्यावर योग्य लस उपलब्ध न झाल्यास हा कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढविणे अनिवार्य असल्याचेही यात नमूद केले.

देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. याबाबत उदाहरण देताना अहवालात म्हटले आहे की, राज्यात प्रति एक हजार व्यक्तीमागे केवळ १८४ रुग्णभरती क्षमता आहे. तर, ७० आयसीयू उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर, औषधे आणि इतर वैद्यकीय संसाधनांची संख्याही अतिशय कमी आहे. त्यामुळे कमीत कमी नागरिक या आजाराने बाधित होतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या या औषधाची कोणतीही लस उपलब्ध नसल्याने, संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन कालावधी ३० जूनपर्यंत वाढविणे गरजेचे आहे.देशात केवळ १ लाख व्हेंटिलेटरभारतात सुमारे ३६ कोटी ४० लाख नागरिक बाधित होऊ शकतात. हा आकडा बघता ३१ लाख २० हजार व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. भारतात १५ लाखांपर्यंत मृत्यू होऊ शकतात, यातील ८० टक्के मृत्यू हे वृद्धांचे होतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. भारतात केवळ १ लाख व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. येत्या काळात ही संख्या वाढवावी लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Armyभारतीय जवानPuneपुणे