शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवा, लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 01:45 IST

देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. याबाबत उदाहरण देताना अहवालात म्हटले आहे की, राज्यात प्रति एक हजार व्यक्तीमागे केवळ १८४ रुग्णभरती क्षमता आहे.

निनाद देशमुख।

पुणे : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आलेला १४ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवून ३ मेपर्यंत केला आहे; मात्र देशातील वैद्यकीय संसाधने बघता लॉकडाऊन ३० जूनपर्य$ंत वाढवावा; तसेच देशातील व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात यावी, असा निष्कर्ष पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील ‘आएएनएस अश्विनी’ या नौदलाच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून काढला आहे.

देशात ‘कोव्हिड-१९’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील अनेक संस्था ‘कोरोना’वर लस शोधत आहेत. या समस्येचा सामना कसा करावा आणि त्यावर काय उपाय योजावे, यावर पुण्यातील लष्करी महाविद्यालय आणि मुंबईतील ‘आयएनएस अश्विनी’ या नौदलाच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे ‘मॅथेमॅटिक्स मॉडेलिंग आॅफ पोस्ट लॉकडाऊन’ हा संयुक्त अभ्यास करण्यात आला. ‘आयएनएस अश्विनी’तर्फे डॉ. कौस्तुक चॅटर्जी, तर एएफएमसीतर्फे डॉ. कौशिक चॅटर्जी, डॉ. अरुण यादव आणि डॉ. शंकर सुब्रह्मण्यम यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासानुसार सध्याची परिस्थिती पाहता आता असलेला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्याची गरज आहे. जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही व त्यावर योग्य लस उपलब्ध न झाल्यास हा कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढविणे अनिवार्य असल्याचेही यात नमूद केले.

देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. याबाबत उदाहरण देताना अहवालात म्हटले आहे की, राज्यात प्रति एक हजार व्यक्तीमागे केवळ १८४ रुग्णभरती क्षमता आहे. तर, ७० आयसीयू उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर, औषधे आणि इतर वैद्यकीय संसाधनांची संख्याही अतिशय कमी आहे. त्यामुळे कमीत कमी नागरिक या आजाराने बाधित होतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या या औषधाची कोणतीही लस उपलब्ध नसल्याने, संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन कालावधी ३० जूनपर्यंत वाढविणे गरजेचे आहे.देशात केवळ १ लाख व्हेंटिलेटरभारतात सुमारे ३६ कोटी ४० लाख नागरिक बाधित होऊ शकतात. हा आकडा बघता ३१ लाख २० हजार व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. भारतात १५ लाखांपर्यंत मृत्यू होऊ शकतात, यातील ८० टक्के मृत्यू हे वृद्धांचे होतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. भारतात केवळ १ लाख व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. येत्या काळात ही संख्या वाढवावी लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Armyभारतीय जवानPuneपुणे