शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

राडारोडा व जलपर्णीमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:57 AM

पावसाचा जोर वाढल्यानंतर नद्यांमधील पाण्याची वाढलेली पातळी, खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वाहून आलेल्या जलपर्णी आणि राडारोडा यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे : पावसाचा जोर वाढल्यानंतर नद्यांमधील पाण्याची वाढलेली पातळी, खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वाहून आलेल्या जलपर्णी आणि राडारोडा यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डास आणि माश्यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नोंदवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.शहराचा मोठा भाग व्यापलेल्या मुळा-मुठा नदीच्या पात्रात वाढलेल्या राडारोड्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढली आहे. पाण्यामध्ये वाढलेली जलपर्णी, कचरा यामुळे डास मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहराच्या हद्दीत खराडी, वारजे- माळवाडी, औंध, बोपोडी, पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, संगमवाडी, ढोलेपाटील रोड, कल्याणीनगर हे भाग नदीच्या जवळच आहे. येथील नागरिक डासांमुळे हैराण झालेले असतानाच त्यांना अनेक आजारांचाही सामना करावा लागत आहे.या परिसरातील डेंगी, मलेरिया, चिकुनगुन्या व हिवतापाच्या रुग्णाची संख्या वाढली आहे. आतापर्यंत पुण्यात डेंगीचे १६१ संशयित रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४७ रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.आतापर्यंत चिकुनगुनियाचे १७, तर टायफॉईडचे ९ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचे ४ तर संसर्गजन्य हिपॅटायटिसचे ७ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे.स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३५५असून त्यातील ७४ जणांचा आतापर्यंत या आजाराने मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन या नदीपात्राच्या स्वच्छतेकडे कधी लक्षदेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.जलपर्णीमुळे माश्यांचा प्रादुर्भाव1महानगरपालिकेकडून भिडे पूल, सिद्धेश्वर पूल येथील जलपर्णी स्पायडर मशिनच्या साह्याने हटवण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली. खराडी पुलाजवळील जलपर्णी हटवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. याबाबत कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख कल्पना बळिवंत म्हणाल्या, ‘वाहून आलेल्या जलपर्णीवर डासांची पैदास होत नाही. जलपर्णीबरोबर वाहून आलेला कचरा, अन्नपदार्थ यामुळे डास, माश्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.2मशिनच्या साह्याने बहुतांश जलपर्णी हटवण्यात आल्या आहेत. या जलपर्णीवर आॅरगॅनिक स्प्रे मारल्यावर त्या आकसतात आणि विल्हेवाट लावली जाते. आपल्या भागातील नदी, नाले आदी ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आल्यास नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेशी संपर्क साधावा.’