शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पुणे जिल्ह्यात वन पर्यटनस्थळी सूर्यास्तानंतर बंदीच; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 09:31 IST

यापुढे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या निर्धारित करून त्यांना ऑनलाइन पर्यटक परवाना देण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत....

पुणे : लोणावळ्यातील भुशी धरणात घडलेल्या दुर्घटनेनंतर वनक्षेत्रात असलेल्या पर्यटनस्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशावर बंदी आहे. या नियमाचे जिल्ह्यात यापुढे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यापुढे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या निर्धारित करून त्यांना ऑनलाइन पर्यटक परवाना देण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून हडपसरमधील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. हा नियम जुनाच असला तरी अशा पर्यटनस्थळांवर सर्रास पर्यटक दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. यापुढे या निर्णयाची अमंलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर आणि इंदापूर या तालुक्यातील डोंगर, धबधबे, गडकिल्ले, घाट, धरण, तलाव आदी परिसरात पावसाळी पर्यटनाकरिता येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत. त्यात प्रामुख्याने वनविभाग आणि पाटबंधारे विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणांची गर्दीनुसार अ, ब, क अशा तीन प्रकारात वर्गवारी करून पर्यटकांची नोंद करावी. हे सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याबाबतची खात्री करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

यात अ दर्जाच्या (सर्वाधिक गर्दीचे किंवा पसंतीचे) ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी धारण क्षमता निर्धारित करावी. यासाठी अनुभवी दुर्ग अभ्यासक, पर्यावरण अभ्यासकांची मदत घ्यावी. गर्दी धारण क्षमतेनुसार नियंत्रित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पर्यटक परवाना देण्यात यावा, प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वावर हे पर्यटक परवाने देण्यात यावे. पोलिसांकडून सुट्टीच्या दिवशी अशा ठिकाणांवर विशेषकरून येण्या-जाण्याच्या मार्गावर, मोक्याच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिस, वनविभाग, पाटबंधारे विभाग यांनी आपल्या आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचावकार्यासाठी मदत करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना याबाबत प्रशिक्षण देणे, तसेच मदत व बचावकार्यासाठी लागणारे साहित्य त्यांना उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभागाने जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने अभ्यास करून आपत्कालीन आराखडा सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनforestजंगल