शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

महाराष्ट्रात महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा मिश्किल टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 09:07 IST

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही

वाघोली : आगामी लोकसभा महाराष्ट्रातून महायुतीच्या ४८ पैकी ४५ जागा निवडून येतील असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यावरून  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिश्कीलपणे टोला लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील असं ते यावेळी म्हणाले आहेत.

वाघोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांच्या भेटीला दानवे आले असता ते बोलत होते. पुढे दानवे म्हणाले कि, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज असल्याने जनतेत आक्रोश आहे. सर्वसामान्य माणसाला अधिकारी वर्गाने धारेवर धरले आहे. अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्येची जाण असते. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही. तर देशात मोदी हारेल बघत राहा असे देखील मिश्किल पणे सांगितले. शिंदे सरकारने आरक्षणाचे प्रणेते जरांगे पाटील यांना फसवले असल्याने मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. तर तीन पक्षांना उमेदवार मिळत नसल्याने इतर पक्षातील उमेदवार आयात करावे लागत आहेत. असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सारिका हरगुडे, पोपट शेलार,रवी कुटे,वसंत जाधवराव,संग्राम जाधवराव व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेAmbadas Danweyअंबादास दानवेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा