शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
3
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
4
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
5
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
6
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
7
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
8
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
9
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
10
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
11
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
12
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
13
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
14
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
15
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
16
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
17
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
18
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
19
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
20
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही :सुनील देवधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:09 IST

त्रिपुरात भाजपची सत्ता आल्यावर त्याचे श्रेय प्रभारी सुनील देवधर यांना देण्यात आले. निवडणुकीपूर्वी त्रिपुरात नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती स्वतः देवधर यांनी दिली. मात्र आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी निभवायची असून महाराष्ट्राच्या राजकारणात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देत्रिपुरा भाजपमध्ये पुढचे सहा महिने प्रवेश नाही सध्या पुतळ्यांची नाही माणसांची चिंता करण्याची गरज

पुणे : मला महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही असे वक्तव्य भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांनी व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की,मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी मोर्च्याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी मी फक्त त्रिपुरात बोलायला योग्य आहे.फडणवीस कार्यकुशल मुख्यमंत्री आहे. या संकटाचा मुख्यमंत्री आणि पक्ष म्हणून भाजप योग्य सामना करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्रिपुरात भाजपची सत्ता आली असली तरी पुढील सहा महिने पक्ष प्रवेश बंद असणार असल्याचे धोरण त्यांनी स्पष्ट केले.   

लेनिन पुतळ्याच्या संदर्भात घडलेल्या घटनेवर बोलताना त्यांनी आम्ही त्या घटनेशी अजिबात सहमत नाही.. एखादा मूर्खपणा करतो त्याचे अनुकरण करत अजून चार जण करत असतील तरीही तो मुर्खपणाचं असतो. सध्या पुतळ्यांची चिंता कमी करून जिवंत माणसांची करायची गरज आहे असेही ते मतही त्यांनी मांडले.पुढे ते म्हणाले की, देशातील एकमेव त्रिपुरा राज्यात कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कम्युनिस्टमुक्त भारतची जबाबदारी  दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्रिपुरात कम्युनिस्ट पक्षाने कधीही प्रामाणिकपणे जिंकलेली नाहीये. त्यांचा पाया अपराध, बेईमानी आहे त्यामुळे त्यांच्याकडून  प्रामाणिक कामाची अपेक्षा चुकीची आहे. यंदाची शंभर टक्के निवडणूक कॅमेऱ्याच्या नियंत्रणात झाली. त्यामुळे ईच्छा असूनही त्यांना काहीही करता आले नाही. 25 वर्ष कम्युनिस्ट सरकार असूनही त्रिपुरात आजही 67 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जगत आहेत.भारतात महिलांवर सर्वाधिक अत्याचार त्रिपुरात आहे. गुन्हे वेगवान आणि तपास संथ परिस्थिती आहे बलात्कार हा तिथे राजकीय सूड घेण्याचा प्रकार आहे. हा प्रकार फक्त कम्युनिस्ट सरकारच्या काळात होत होता असा आरोपही त्यांनी केला . माणिकसरकार ते फक्त निरुपयोगी मुख्यमंत्री होते. त्यांच्या खिशात 1300 रुपये, खात्यात 2300 रुपये मात्र 40 किलोमीटरसाठी खासगी हेलिकॉप्टर कसे वापरायचे असा सवालही त्यांनी विचारला.

टॅग्स :PuneपुणेTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018BJPभाजपा