शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

पुणे-सोलापूर मार्गावर अवैध वाहतूक, अपघाताची शक्यता, पोलिसांचे दुर्लक्ष, वाहतूककोंडीत वाढ, कारवाईची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:13 IST

पुणे-सोलापूर मार्गावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची वाहतूक केली जाते. मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसवले जात आहे.

कोरेगाव मूळ : पुणे-सोलापूर मार्गावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची वाहतूक केली जाते. मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसवले जात आहे. याबरोबरच त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.पुणे-सोलापूर मार्गावर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात जाणे-येणे असते. अनेकदा बस मिळत नसल्याने या प्रवाशांना या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर तीनचाकी रिक्षाने उरुळी कांचन ते हडपसर दरम्यान प्रामुख्याने ही वाहतूक होते. ही वाहतूक करताना वाहतूक नियमांची पायमल्ली या वाहनचालकांकडून केली जात आहे. वाहनांच्या क्षमतेपेक्षाही प्रवाशांना बसविले जाते. तसेच, या मार्गावर वाहतूक नियमांची या चालकांकडून पायमल्ली होत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.कारवाईस टाळाटाळ : प्रवाशांचा जीव धोक्यातपुणे शहराचा विस्तार होत असताना सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर, उरुळी कांचन या उपनगरांचा प्रचंड विस्तार होत आहे. सध्या या महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होते. सोलापूर महामार्गावर सध्या ४ आसनी वाहनांची संख्या वाढली आहे. यावर महामार्ग पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.हे बेशिस्त चालक वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहेत. मर्जीप्रमाणे कोणालाही न जुमानता जास्त प्रमाणात वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी ही वाहने उभी केली जात आहे.हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या पॅगो रिक्षा, तसेच जिल्ह्याबाहेरील सहाआसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या शेकडो वाहनांतून ही वाहतूक निर्धोक सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणे