शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Be Positive: कोरोना झालाय मग 'No Tension' दुखणे अंगावर काढू नका अन् सात दिवसांत बरे व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 11:22 IST

वेळेत निदान आणि योग्य उपचार यामुळे कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटू शकते

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तो सात दिवसांत बरा होत आहे. गृह विलगीकरण कालावधीही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे आढळली तरी तातडीने चाचणी करणे गरजेचे आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार यामुळे कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटू शकते. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णामध्ये सुरुवातीला ताप, खोकला, वास किंवा चव जाणे अशी सौम्य लक्षणे दिसत होती. पहिले चार दिवस उलटल्यानंतर ऑक्सिजन पातळी कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, फुप्फुसांमध्ये संसर्ग वाढणे असा त्रास वाढीस लागत होता. सुरुवातीला तीन-चार दिवस लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागत होते. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांमध्ये घसा खवखवणे, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा अशा स्वरूपाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे पहायला मिळत आहेत. पाच-सात दिवसांमध्ये लक्षणे कमी होऊन सात दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. सध्या बहुतांश लक्षणे कोरोनाचीच दिसत असल्याने रुग्णांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार सुरू करावेत, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. कल्पना देसाई यांनी दिला आहे.

या औषधींचा केला जातोय वापर

''रुग्णांमधील लक्षणे पाहून औषधोपचार ठरवले जात आहेत. पॅरासिटॅमॉल, व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्या ही औषधे सर्वसाधारणपणे वापरली जात असून त्याबरोबर लक्षणांप्रमाणे एक किंवा दोन औषधे समाविष्ट केली जात आहेत. मात्र, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा चिठ्ठीशिवाय घेणे म्हणजे आजारातील गुंतागुंत वाढवण्यासारखे आहे असे डॉ. अनिकेत देशपांडे यांनी सांगितले.''  

विषाणू पोहोचतोय गळ्यापर्यंतच

सध्या ८० टक्के लोकांना ओमायक्रॉनची तर २० टक्के लोकांना डेल्टाची लागण होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग जास्त असला तरी हा विषाणू गळ्यापर्यंतच परिणामकारक ठरत आहे. फुप्फुसांमध्ये संसर्ग करण्याची विषाणूची ताकद कमी आहे.

ही लक्षणे दिसताच करा चाचणी

अंगदुखी, थकवा, गळून गेल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे, ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे तीन दिवसांहून अधिक काळ टिकल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी.

गर्दी टाळा, मास्क वापरा

''सध्या संसर्गाचे प्रमाण खूप वेगवान आणि जास्त आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये लगेचच लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे लसीकरण पूर्ण करून घेणे, गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे हे नियम सर्वांनी पाळणे आवश्यक आहे असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.'' 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर