शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अभयारण्यातच खायला मिळालं, तर थांबतील हल्ले! पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 12:42 IST

बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज

पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले, तर एका तरुणाचा जीव घेतला आहे. त्यामुळे बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे. त्यासाठी कायमस्वरूपी पावले उचलणे आवश्यक आहे, तरच बिबट्यांचे हल्ले कमी होतील. त्यांच्या मूळ अधिवासात चिंकारा, हरीण, चितळ, काळवीट यांची प्रजोत्पादने वाढवली तर बिबट्यांना खाद्य मिळेल आणि साहजिकच ते मानवी वस्तीकडे येणार नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जुन्नर परिसर, भीमाशंकर अभयारण्य हे बिबट्याचे क्षेत्र मानले जाते. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणांहून बिबटे बाहेर पडत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते पोहोचले आहेत. पुण्याच्या वेशीपर्यंत येऊ लागले आहेत. त्यामुळे मानव-बिबट संघर्ष वाढला आहे. त्यात अनेकजण जखमी, तर काहींना आपला जीव गमवावा लागत आहेत. म्हणून यावर ठोस धोरण करणे अत्यावश्यक ठरले आहे. माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने वन्यजीवांसाठी खास धोरण करायला हवे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावादेखील केला आहे. परंतु, अद्याप तरी सरकारकडून काहीच उपाययोजना होताना दिसून येत नाही. परिणामी बिबट-मानव संघर्ष वाढत आहे.

भीमाशंकर अभयारण्यात कमी आणि इतर भागात बिबट अधिक पाहायला मिळत आहेत. मुळात त्यांचे खाद्य चिंकारा, चितळ, हरीण, काळवीट यांची संख्या कमी झाली. त्यांचा अधिवास असलेला भाग कमी झाला. त्यामुळेच त्यांना अन्नासाठी इतरत्र भटकावे लागते. उसाच्या शेतीमुळे तर त्यांना राहण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मादी बिबट एकावेळी तीन-चार बछड्यांना जन्म देत आहे. उसाचे क्षेत्र त्यांच्या बछड्यांसाठी अतिशय सुरक्षित असते. परिणामी ते आता मूळ अधिवासात कमी आणि या उसाच्या शेतातच राहत आहेत.

प्रजोत्पादन केंद्रे हवीत

बिबट्यांसाठी खास चितळ, हरीण, काळवीट, चिंकारा या प्राण्यांची प्रजोत्पादन केंद्रे तयार केली पाहिजेत. त्यामुळे बिबट्यांना खायला मिळू शकते. जर त्यांच्या अधिवासात योग्य खाद्य मिळाले, तर ते बाहेर भटकंती करणार नाहीत, असा उपाय माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने सांगितला आहे. सरकारने यावर योग्य निर्णय घ्यायला हवा.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforestजंगलGovernmentसरकार