शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

अभयारण्यातच खायला मिळालं, तर थांबतील हल्ले! पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 12:42 IST

बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज

पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले, तर एका तरुणाचा जीव घेतला आहे. त्यामुळे बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे. त्यासाठी कायमस्वरूपी पावले उचलणे आवश्यक आहे, तरच बिबट्यांचे हल्ले कमी होतील. त्यांच्या मूळ अधिवासात चिंकारा, हरीण, चितळ, काळवीट यांची प्रजोत्पादने वाढवली तर बिबट्यांना खाद्य मिळेल आणि साहजिकच ते मानवी वस्तीकडे येणार नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जुन्नर परिसर, भीमाशंकर अभयारण्य हे बिबट्याचे क्षेत्र मानले जाते. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणांहून बिबटे बाहेर पडत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते पोहोचले आहेत. पुण्याच्या वेशीपर्यंत येऊ लागले आहेत. त्यामुळे मानव-बिबट संघर्ष वाढला आहे. त्यात अनेकजण जखमी, तर काहींना आपला जीव गमवावा लागत आहेत. म्हणून यावर ठोस धोरण करणे अत्यावश्यक ठरले आहे. माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने वन्यजीवांसाठी खास धोरण करायला हवे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावादेखील केला आहे. परंतु, अद्याप तरी सरकारकडून काहीच उपाययोजना होताना दिसून येत नाही. परिणामी बिबट-मानव संघर्ष वाढत आहे.

भीमाशंकर अभयारण्यात कमी आणि इतर भागात बिबट अधिक पाहायला मिळत आहेत. मुळात त्यांचे खाद्य चिंकारा, चितळ, हरीण, काळवीट यांची संख्या कमी झाली. त्यांचा अधिवास असलेला भाग कमी झाला. त्यामुळेच त्यांना अन्नासाठी इतरत्र भटकावे लागते. उसाच्या शेतीमुळे तर त्यांना राहण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मादी बिबट एकावेळी तीन-चार बछड्यांना जन्म देत आहे. उसाचे क्षेत्र त्यांच्या बछड्यांसाठी अतिशय सुरक्षित असते. परिणामी ते आता मूळ अधिवासात कमी आणि या उसाच्या शेतातच राहत आहेत.

प्रजोत्पादन केंद्रे हवीत

बिबट्यांसाठी खास चितळ, हरीण, काळवीट, चिंकारा या प्राण्यांची प्रजोत्पादन केंद्रे तयार केली पाहिजेत. त्यामुळे बिबट्यांना खायला मिळू शकते. जर त्यांच्या अधिवासात योग्य खाद्य मिळाले, तर ते बाहेर भटकंती करणार नाहीत, असा उपाय माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने सांगितला आहे. सरकारने यावर योग्य निर्णय घ्यायला हवा.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforestजंगलGovernmentसरकार