शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

"जातीवादाच्या पलीकडं जाऊन अन् एकमेकांना बरोबर घेऊन काम केल्यास होईल देशाचा विकास", भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:44 IST

एकजुटीच्या बळावर जातीभेदाच्या श्रृखंला गळून समतेचे राज्य प्रस्थापित होईल

ठळक मुद्देमोदींमुळे देशाप्रती विदेशात राहाणा-या भारतीयांचा अभिमानाने उर भरून येतो

पुणे :  स्वराज्य म्हणजे सुराज्य. या देशात कुणी गरीब, पीडित राहाणार नाही. हे सगळं संपायला हवं. तरच सुराज्य आलं असं म्हणता येईल. पैशानेचं सगळी कामे पार पडली जातात ही धारणा संपली पाहिजे. तसेच देशातून जातपात संपुष्टात आली पाहिजे. जातीवादाच्या पलीकडं जाऊन अन् एकमेकांना बरोबर घेऊन काम केल्यास  देशाचा विकास होईल असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. 

कोव्हिड काळात विविध संस्था - संघटना आणि वैयक्तिक पातळीवर देखील अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सर्वसामान्य व्यक्ती पासून ते उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत सर्वांचाच यात समावेश होता. या कठीण काळात दाखविलेल्या एकजुटी मुळेच आपण हे संकट परतावून लावू शकलो आहोत. अशाच एकजुटीच्या बळावर जातीभेदाच्या श्रृखंला गळून समतेचे राज्य प्रस्थापित व्हावं असंही ते म्हणाले. 

पुण्यातील अशाच काही सेवाव्रती व्यक्तींचा आणि संस्थांचा पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फौंडेशनतर्फे भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. 

मोदींमुळे देशाप्रती विदेशात राहाणा-या भारतीयांचा अभिमानाने उर भरून येतो

''ज्यांचे हदय मोठं असतं तेच ख-या अर्थाने मोठे असतात. मग ते सामान्य व्यक्ती असोत किंवा उच्चपदस्थ व्यक्ती असोत. सर्वांचे काम मोठे आहे. जे निष्पाप आणि निष्कलंक आहेत ते समर्पण भावनेने सेवा देत असतात. हा सेवाभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रूजविला. मोदी यांनी सदैव दुस-यांचे दुःख, वेदना जाणून घेत धोरणांची आखणी केली. त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणा-या स्वच्छता, शौचालय, वीज, अशा मुलभूत समस्यांना हात घातला. ज्या नागरिकांनी पिढ्यान पिढ्या बँकेची पायरी चढली नव्हती अशांचे जनधन योजने मार्फत बँकेशी संबंंध जोडून दिले. सरकारमध्ये कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही ही प्रस्थापित झालेली धारणा मोदी सरकार आता खोडून काढत आहेत. मोदी यांच्यामुळेच देशाप्रती विदेशात राहाणा-या भारतीयांचा अभिमानाने उर भरून येतो. देशातून जातपात हददपार झाली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.''

हे रबर स्टॅम्प राज्यपाल नाहीत - चंद्रकांत पाटील 

''महाराष्ट्राला लाभलेले राज्यपाल हे रबर स्टॅम्प राज्यपाल नसून, ते त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धी ला जागृत ठेवत त्यांना योग्य वाटतील तेच निर्णय घेतात. कोणी कर म्हणून सांगितले म्हणून ते करीत नाही. उलट कोणी सांगितले की कर असे म्हटलं तर ते मुळीच करीत नाहीत. त्यांचे काम रात्री बारापर्यंत सुरूच असते, अशी मिश्कील टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी करताच सभागृहात  हशा पिकला. राज्यपालांना शेलकी विशेषणे लावली गेली. त्यांच्यावर टीका झाली तरी ते आनंदाने पुढे मार्गक्रमण करीत राहातात. नकारात्मक गोष्टींपासून पळून जायचे नाही हे राज्यपालांकडून शिकायला मिळाले, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांवर स्तुतीसुमने उधळली.''

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी