शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या रेशन कार्डावर शिक्के नाहीत तर आम्ही जगायचं नाही का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 17:25 IST

रेशन कार्डावर अन्न सुधारणा योजनेचा शिक्का नसेल तर अशांना स्वस्त धान्य देण्यास दुकानदारांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आमच्या रेशन कार्डावर शिक्के नसतील तर आम्ही जगायचं नाही का असा अगतिक सवाल गोर गरीब जनता विचारत आहे. 

पुणे : स्वस्त धान्याच्या दुकानात नव्हे फक्त दारिद्रयरेषेखालील नव्हे तर इतरही गरीब, गरजू कुटुंबांना धान्य मिळेल अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्ष घोषणा आणि अंमलबजावणी यांच्यातील अंतर आता जाणवायला लागले आहे. रेशन कार्डावर अन्न सुधारणा योजनेचा शिक्का नसेल तर अशांना स्वस्त धान्य देण्यास दुकानदारांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आमच्या रेशन कार्डावर शिक्के नसतील तर आम्ही जगायचं नाही का असा अगतिक सवाल गोर गरीब जनता विचारत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या जगण्याला जणू घरघर लागली आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व कामं बंद  झाल्यामुळे कमवायचं काय आणि खायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यात सरकारने अन्नाचा तुटवडा भासू  म्हणून रेशन दुकानावर प्रत्येकाला मोफत धान्य मिळेल अशी घोषणा केली. मुंबईत तर अशा दुकानांची यादीही जाहीर झाली. दुर्दैवाने पुण्यात मात्र असे काहीही झालेले नाही. आपल्या कार्डावर शिक्के मारून मिळतील, आपल्याला ध्यान मिळेल या खोट्या आशेपायी नागरिक रोज दुकानांचे उंबरे मात्र झिजवत आहेत.

याबाबत स्थानिक नागरिक सुनीता बांदल म्हणाल्या की, 'इथे सगळे मोलमजुरी करणारे लोक राहतात. अनेकांच्या कार्डावर शिक्का नाही. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यांनी लागायचं कस हाच प्रश्न निर्माण झाला आहे. आज १५ दिवस झाले काम बंद आहे. काहीजण मदत करत आहेत पण त्यावर किती दिवस काढणार ? तिथे भाजी विक्रेत्या महिलेला अश्रू अनावर झाले होते. उसने धान्य घेऊन दिवस काढतो आहे. आम्हाला कोणाचाही आधार नाही. अनेक ठिकाणी चकरा मारूनही कोणी पुस्तकावर शिक्के मारत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान दुकानदारांनाही तशा कोणत्याही लेखी सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे जेवढे धान्य आले आहे तितकेच धान्य दिले जात आहे. हे वितरण करतानाही अधिकाधिक सोशल डिस्टन्स पाळण्याचा प्रयत्न होतो आहे.याबाबत दुकानदार काशिनाथ चव्हाण म्हणाले की, 'नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा होते मात्र आम्हाला जोवर लेखी जीआर आणि पुरवठा येईल तेव्हा आम्ही देऊ मात्र सध्या तरी आमच्या हातात काही नाही'. पुण्यात  तरी स्वस्त धान्य दुकानात हीच स्थिती असून जिल्हा प्रशासना याकडे लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने असे झाले नाही तर मात्र प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAdhar Cardआधार कार्डGovernmentसरकार