शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकले, तर देशात लाेकशाही टिकेल, न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:14 IST

Justice Abhay Oak: राज्यघटनेने निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि न्यायालयातून चांगल्या प्रतीचा न्याय लवकर मिळणे गरजेचे आहे. न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकले, तर देशातील लाेकशाही टिकेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

पुणे - राज्यघटनेने निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि न्यायालयातून चांगल्या प्रतीचा न्याय लवकर मिळणे गरजेचे आहे. न्यायालयाचे स्वातंत्र्य टिकले, तर देशातील लाेकशाही टिकेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने आयाेजित ‘राज्यस्तरीय वकील परिषद २०२४’ चे उद्घाटन न्यायमूर्ती ओक यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे, उद्योगमंत्री उदय सामंत, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार, के. आर. श्रीराम आणि रेवती मोहिते-डेरे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण आदी उपस्थित हाेते. 

राज्यात स्वतंत्र कायदा विद्यापीठाची गरज न्या. ओक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांत स्वतंत्र विद्यापीठ आहेत. त्याच धर्तीवर कर्नाटकातही कायदा विद्यापीठ स्थापन झाले आहे. राज्यात कायदा विद्यापीठ स्थापन झाल्यास केवळ काॅलेजला संलग्नता देणे तसेच राज्यभर समान अभ्यासक्रम लागू करणे शक्य हाेईल आणि त्यातून दर्जेदार कायदाविषयक शिक्षण देता येईल.

‘न्यायालय अवमानप्रकरणी कारवाई व्हावी’ सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राजकारणी जाहीर पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य करतात, ही शाेकांतिका आहे. न्यायिक व्यवस्थेचा आदर ठेवला पाहिजे; न्यायालयाच्या निर्णयांवर शंका अथवा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे उद्योगमंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयdemocracyलोकशाही