शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच : रवी परांजपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:18 IST

सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे.

पुणे : सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीलाअभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे. अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याचीगरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही अशा शब्दातं ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी 'रत्नाकर पारितोषिक'मौज दिवाळी अंकासाठी मोनिका गजेंद्रगडकर, रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'ललित' या दिवाळी अंकासाठी अशोक कोठावळे,  'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'समदा' या दिवाळी अंकासाठी संपादिका मनस्विनी प्रभुणे, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'साहित्य शिवार' या दिवाळी अंकासाठी जयराम देसाई यांना देण्यात आले.  त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक राम जगताप यांना , 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाडमयदिवाळी अंकाचे पारितोषिक' वर्षा तोडमल  आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'अक्षर' मधील  'आवर्त' या कथेकरिता विजय खाडिलकर यांना प्रदान करण्यात आले तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'शब्दशिवार' या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या 'येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला' या लेखाला देण्यात आले.यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार तसेच ज्योतिषतज्ञ चंद्रकांत शेवाळेआणि स्पर्धेचे समन्वयक वि.दा पिंगळे उपस्थित होते. परांजपे म्हणाले, ज्या उद्योगधंदयाच्या वाढीसाठी दिवाळी अंकांना जाहिराती मिळतात. त्यावरच आज गदा आली आहे. कलात्मक उद्यमशील अभिजातता उदयास आली असती तर वाचक वाढले असते पण ही कलात्मक अभिजातता वाढली आहे का नाही हे आपण पाहिलेच नाही. कोण म्हणत? आपले साहित्य अभिजात नाही. कमतरता आपल्यातच आहे.प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेचते लेखक वषार्नुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्यारूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोतबदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे. वाचनसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सवर््हेक्षण होण्याची गरज असल्याचे सांगितले.सत्काराला उत्तर देताना मनस्विनी प्रभुणे यांनी  जी लोक दिवाळी अंकांकडे केवळ पैसा कमवण्याच्या हेतूने न पाहाता वाचकांना दर्जेदार साहित्यवाचायला मिळावे यासाठी दिवाळी अंकांची निर्मिती करण्याची धडपड करीत असतात त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षा  व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि.दा पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले तर प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे