शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या भावविश्वाचा विचार महत्त्वाचा - डॉ. संगीता बर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:09 IST

मोठ्यांकरिता लिहीत असलेल्या कविता, इतर लेखनाकरिता मनातील विचारतरंग वेगळ्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र जेव्हा चिमुकल्यांकरिता साहित्य लिहायचे असते त्या वेळी त्या साहित्यिकाला आपले वेगळे भावविश्व तयार करावे लागते. ती त्या विषयाची गरज असते. साहित्यिक जोपर्यंत त्या कलाकृतीच्या भावविश्वाचा भाग होत नाही तोपर्यंत ते साहित्य रसिकांच्या मन:पटलावर आकार घेत नाही. त्यामुळे चिमुकल्यांच्या भावविश्वाचा विचार महत्त्वाचा, असे विचार बालसाहित्यिका संगीता बर्वे यांनी व्यक्त के ले.

साने गुरुजी आरोग्य मंदिर या शिक्षण संस्थेच्या वतीने पार्वतीबाई आव्हाड स्मृती उत्कृष्ठ बालवाङ्मय पुरस्कार बर्वे लिखित ‘पियूची वही’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. बालसाहित्याच्या विविध विषयांवर त्या प्रकाशझोत टाकतात. त्याबद्दल त्या म्हणतात, की बालवाङ्मयाला रसिकांची पसंती मिळत आहे. सध्या बालवाङ्मयाला चांगले दिवस आहेत. नवनवीन बालसाहित्यिक हे मुलांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक बालसाहित्यप्रेमी मुलांकरिता विविध उपक्रम राबवत आहेत. ही एकूणच सगळी आनंदाची प्रक्रिया म्हणावी लागेल. लहान मुलांचे मनोविश्व अत्यंत तरल आणि संवेदनक्षम असते. तेव्हा त्या मनाला साजेल, भावेल असे लेखन करणे हे अवघड असते. बालसाहित्यिक ते आव्हान पेलतो. त्याचे लेखन सर्वश्रुत होते. यामागील त्याची अथक विचारक्षमता लक्षात घ्यायला हवी. आपण खुपदा लहान मुले वाचत नाहीत अशी ओरड करतो. त्यात काही तथ्य नाही. याचे कारण असे, की तुम्ही लहान मुलांना काय वाचायला देता हे जास्त महत्त्वाचे आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या बालमनाला जे आवडतं, भावतं ते साहित्य ते वाचतातच. त्यामुळे बालसाहित्यिकाने लहानांसाठी लिहिताना साधं, सरळ, सोपं लिहायला हवं. आपल्याकडील काही साहित्यिकांनी बालसाहित्यामध्ये नको तितका बोजडपणा आणल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम बालसाहित्यावर झाला. आपण लहान मुलांसाठी लिहितो याचा विसर पडू न देणे हे जमायला हवं. दुसरं असे, की मुलं वाचत नाहीत असा सूर आळवला जातो. यावर उत्तर म्हणजे त्यांना जे आवडते ते आपण देतो का? वाचक हा कुठल्याही स्तरातील असो, त्याच्या आवडी लक्षात घेऊन साहित्याची उपलब्धता असल्यास वाचन होतेच. केवळ नकारात्मकता तयार करण्यासाठी याप्रकारच्या आरोपांत काही तथ्य नाही असे म्हणावे लागेल. वाचनावर परिणाम करणारे घटक वाढले. माध्यमे वाढली. टीव्हीवरील वाहिन्या, सोशल माध्यमे, इंटरनेट यामुळे वाचनाकरिता हाताशी वेळ कमी राहिला. दिवसभरातील बराचसा वेळ हा वेगवेगळ्या माध्यमांवर खर्च झाला. भविष्यात मुलांना वाचनाची गोडी लावायची असल्यास त्यांची आवड जोपासावी लागणार आहे. लहान मुलांचे भावविश्व आणि साहित्यिक याविषयी सविस्तराने सांगायचे झाल्यास, साहित्यिकाला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून काय सांगायचे आहे हे ठरवून त्या साहित्याचा परिघ मनात तयार ठेवावा लागतो. आपले साहित्य कोण वाचणार आहे? हा मुद्दा त्यानंतरचा. वाचकांच्या मानसिकतेचा विचार महत्त्वाचा आहे. खास करून लहान मुलांकरिता जेव्हा लेखन होते त्याप्रसंगी लेखकाला विशेष काळजी घ्यावी लागते. भाषा, संवाद, रुपके, प्रतीके, कथेची मांडणी, कवितेतील शब्द यात बारकाईने केलेल्या विचारांमुळेच त्या साहित्याची उंची वाढते. मग ते लोकप्रिय होते. आपल्याकडे बालसाहित्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज असून, त्यांची आवड जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागणार आहे. केवळ लहान मुलांकरिता पुस्तके काढून उपयोग नाही, तर ते साहित्य त्यांच्याकरिता वाचनयोग्य होण्यासाठी बालसाहित्यिकाची जबाबदारी वाढली आहे. मुलांना ओळखून लिहायला शिकणे, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, पोटात शिरून लिहायला जमल्यास तो लेखक आणि बालवाचक यांचा संवाद बहरतो. खरं तर कुठल्याही प्रकारच्या साहित्याच्या उन्नतीकरिता जाणीवपूर्वक कार्यशील आणि प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे वाटते. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या