शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

चिमुकल्यांच्या भावविश्वाचा विचार महत्त्वाचा - डॉ. संगीता बर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:09 IST

मोठ्यांकरिता लिहीत असलेल्या कविता, इतर लेखनाकरिता मनातील विचारतरंग वेगळ्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र जेव्हा चिमुकल्यांकरिता साहित्य लिहायचे असते त्या वेळी त्या साहित्यिकाला आपले वेगळे भावविश्व तयार करावे लागते. ती त्या विषयाची गरज असते. साहित्यिक जोपर्यंत त्या कलाकृतीच्या भावविश्वाचा भाग होत नाही तोपर्यंत ते साहित्य रसिकांच्या मन:पटलावर आकार घेत नाही. त्यामुळे चिमुकल्यांच्या भावविश्वाचा विचार महत्त्वाचा, असे विचार बालसाहित्यिका संगीता बर्वे यांनी व्यक्त के ले.

साने गुरुजी आरोग्य मंदिर या शिक्षण संस्थेच्या वतीने पार्वतीबाई आव्हाड स्मृती उत्कृष्ठ बालवाङ्मय पुरस्कार बर्वे लिखित ‘पियूची वही’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. बालसाहित्याच्या विविध विषयांवर त्या प्रकाशझोत टाकतात. त्याबद्दल त्या म्हणतात, की बालवाङ्मयाला रसिकांची पसंती मिळत आहे. सध्या बालवाङ्मयाला चांगले दिवस आहेत. नवनवीन बालसाहित्यिक हे मुलांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक बालसाहित्यप्रेमी मुलांकरिता विविध उपक्रम राबवत आहेत. ही एकूणच सगळी आनंदाची प्रक्रिया म्हणावी लागेल. लहान मुलांचे मनोविश्व अत्यंत तरल आणि संवेदनक्षम असते. तेव्हा त्या मनाला साजेल, भावेल असे लेखन करणे हे अवघड असते. बालसाहित्यिक ते आव्हान पेलतो. त्याचे लेखन सर्वश्रुत होते. यामागील त्याची अथक विचारक्षमता लक्षात घ्यायला हवी. आपण खुपदा लहान मुले वाचत नाहीत अशी ओरड करतो. त्यात काही तथ्य नाही. याचे कारण असे, की तुम्ही लहान मुलांना काय वाचायला देता हे जास्त महत्त्वाचे आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या बालमनाला जे आवडतं, भावतं ते साहित्य ते वाचतातच. त्यामुळे बालसाहित्यिकाने लहानांसाठी लिहिताना साधं, सरळ, सोपं लिहायला हवं. आपल्याकडील काही साहित्यिकांनी बालसाहित्यामध्ये नको तितका बोजडपणा आणल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम बालसाहित्यावर झाला. आपण लहान मुलांसाठी लिहितो याचा विसर पडू न देणे हे जमायला हवं. दुसरं असे, की मुलं वाचत नाहीत असा सूर आळवला जातो. यावर उत्तर म्हणजे त्यांना जे आवडते ते आपण देतो का? वाचक हा कुठल्याही स्तरातील असो, त्याच्या आवडी लक्षात घेऊन साहित्याची उपलब्धता असल्यास वाचन होतेच. केवळ नकारात्मकता तयार करण्यासाठी याप्रकारच्या आरोपांत काही तथ्य नाही असे म्हणावे लागेल. वाचनावर परिणाम करणारे घटक वाढले. माध्यमे वाढली. टीव्हीवरील वाहिन्या, सोशल माध्यमे, इंटरनेट यामुळे वाचनाकरिता हाताशी वेळ कमी राहिला. दिवसभरातील बराचसा वेळ हा वेगवेगळ्या माध्यमांवर खर्च झाला. भविष्यात मुलांना वाचनाची गोडी लावायची असल्यास त्यांची आवड जोपासावी लागणार आहे. लहान मुलांचे भावविश्व आणि साहित्यिक याविषयी सविस्तराने सांगायचे झाल्यास, साहित्यिकाला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून काय सांगायचे आहे हे ठरवून त्या साहित्याचा परिघ मनात तयार ठेवावा लागतो. आपले साहित्य कोण वाचणार आहे? हा मुद्दा त्यानंतरचा. वाचकांच्या मानसिकतेचा विचार महत्त्वाचा आहे. खास करून लहान मुलांकरिता जेव्हा लेखन होते त्याप्रसंगी लेखकाला विशेष काळजी घ्यावी लागते. भाषा, संवाद, रुपके, प्रतीके, कथेची मांडणी, कवितेतील शब्द यात बारकाईने केलेल्या विचारांमुळेच त्या साहित्याची उंची वाढते. मग ते लोकप्रिय होते. आपल्याकडे बालसाहित्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज असून, त्यांची आवड जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागणार आहे. केवळ लहान मुलांकरिता पुस्तके काढून उपयोग नाही, तर ते साहित्य त्यांच्याकरिता वाचनयोग्य होण्यासाठी बालसाहित्यिकाची जबाबदारी वाढली आहे. मुलांना ओळखून लिहायला शिकणे, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, पोटात शिरून लिहायला जमल्यास तो लेखक आणि बालवाचक यांचा संवाद बहरतो. खरं तर कुठल्याही प्रकारच्या साहित्याच्या उन्नतीकरिता जाणीवपूर्वक कार्यशील आणि प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे वाटते. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या