शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
3
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
4
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
5
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
6
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
7
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
8
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
9
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
10
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
11
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
12
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
13
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
15
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
16
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
17
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
18
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
19
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
20
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?

‘मी आत्महत्या करणार नाही तर मी लढणार’ :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १ मेपासून अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:42 IST

कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये, असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल.

ठळक मुद्देराज्यातील ११ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार, धर्मा पाटील यांच्या गावापासून सुरूवात

पुणे: कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतक-यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मात्र,शेतक-यांनी आत्महत्येचा विचार करू नये, यासाठी येत्या १ मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ‘मी आत्महत्या करणार नाही तर मी लढणार’या अभियानाला सुरूवात करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दोन दिवस देहू येथे पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील माजी खासदार सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला असून रविकांत तुपकर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.  शेट्टी म्हणाले,मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील गावापासून अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार असून ९ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात या अभियामाची सांगता होईल. गावोगावी जाऊन शेतक-यांना विश्वासात घेतले जाईल.कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये,असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल.  खासगी सावकारासह शेतक-याचे सर्व कर्ज एक रक्कमी माफ करून शेतक-यांचा सात-बारा कोरा करावा. तसेच शेतक-याला दीडपट हमीभाव मिळावा यासाठी येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी दोन विधेयके स्वत: संसदेत सादर करणार आहे. त्यास देशातील ३२ हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे येत्या १ मे रोजी होणा-या गाव सभेत या विधेयकांना पाठिंबा देण्याचे ठराव केले जाणार आहेत. हे ठराव लोकसभा व राज्यसभेच्या सभापतीना पाठविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या १० मे रोजी १८५७ बंडाला १६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने किसान सभेतर्फे राबविल्या जाणा-या अभियानाचा भाग म्हणून हजारो शेतक-यांच्या स्वाक्ष-या घेतल्या जातील. तसेच या स्वाक्ष-यांसह लोकसभेत शेतकरी कर्जमाफी व हमीभाव विषयक मांडल्या जाणा-या विधेयकास मंजूरी मिळावी,यासाठी दबाव टाकणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या