शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वृद्ध होण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही: सदगुरू जग्गी वासुदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 06:38 IST

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या निरामय जीवनाचा कानमंत्र सांगितला.

पुणे :

‘जगभर भ्रमंतीचा निर्णय ईशा फाउंडेशनच्या टीमला माहीतही नव्हता. मी ३ जानेवारीला त्यांना माझी कल्पना सांगितली आणि वेळ कमी असला तरी ती प्रत्यक्षात आणण्याचा निग्रहही केला. मला सतत काम करीत राहायला आवडते. मी माझे आयुष्य मनापासून आणि भरभरून जगतो. वृद्ध होण्यासाठीही माझ्याकडे वेळ नाही’, अशा शब्दांत ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या निरामय जीवनाचा कानमंत्र सांगितला.

प्रदूषण रोखून माती संवर्धनाचा संदेश देण्यासाठी २६ देशांचा दाैरा करून ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू मंगळवारी पुण्यात आले होते. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर त्यांनी पुण्यातील मान्यवरांशी संवाद साधला. या वेळी ‘माती वाचवा’चा (सेव्ह सॉईल) जागर करण्यात आला. व्यासपीठावर लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया, अतुल गोयल, जय श्रॉफ, अभय लोढा, आदी मान्यवर उपस्थित होते.  

सद्गुरू म्हणाले, ‘मानवी शरीरात ६० टक्के जीवजंतू आहेत. जीवजंतूंचे अस्तित्व धोक्यात आल्यास मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. आपण आहार, आरोग्य याबाबत चुकीच्या पद्धतीने विचार करीत असतो. आरोग्याची अतिरेकी काळजी हे आजारपणाचे लक्षण आहे. पोटाला अन्नाची भाषा कळते. कधी, काय आणि किती खावे, हे समजले पाहिजे. आजकाल कार्यक्रमांत जेवणामध्ये २०-२५ पदार्थ असतात. परंतु एकाच वेळी एवढे पदार्थ खाण्याऐवजी एखादाच पदार्थ खाणे योग्य.’  

‘शरीराला विश्रांती आवश्यक असते. मात्र, प्रत्येक वेळी झोप म्हणजे विश्रांती नव्हे, यावरही त्यांनी भाष्य केले. चैतन्य राठी यांनी सूत्रसंचालन केले.काय म्हणाले सद्गुरू? - तुम्ही चांगले खाल्लेच पाहिजे. मात्र, त्याचा अतिरेकही टाळायला हवा. प्रत्येकाच्या जीवनशैलीचा, शरीराचा पॅटर्न वेगवेगळा असतो. त्यानुसार बदल करायला हवेत.- मातीचा दर्जा घसरत असल्याने आपल्या अन्नाचा दर्जाही खालावत चालला आहे. अन्नातील ९० टक्के पोषक घटक कमी झाले आहेत. - फळे, भाज्या यांतील सूक्ष्म, पोषक घटकही गेल्या १०० वर्षांत कमी होत चालले आहेत. मातीचे संवर्धन न होणे हे यामागचे कारण आहे. - आपल्या शरीराचा समतोल जपायचा असेल तर जीवजंतूंचा समतोल आणि मातीचा दर्जाही सांभाळला गेला पाहिजे.- पृथ्वीवर अब्जावधी विषाणू आहेत. त्यातील केवळ १४ हजार आपल्यासाठी घातक आहेत. तरीही आपण आरोग्याची विनाकारण काळजी घेतो.- पारंपरिक अन्न खाणे शरीरासाठी फायद्याचे असते. त्यामुळे आरोग्याला फायदाच होतो. 

‘तुम्हाला पावभाजी, डोसा, इडली, चिली असे चविष्ट पदार्थ खाण्याचा मोह होत नाही का?’ असे विचारले असता, ‘माझ्या हातचा मसाला डोसा खाल तर माझे गुलाम व्हाल,’ अशी मिश्कील टिप्पणीही सद्गुरू यांनी केली.

टॅग्स :Puneपुणे