शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

'मला काहीच बोलायचे नाही...' अब्दुल सत्तारांच्या प्रश्नावर नारायण राणे चिडले

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 8, 2022 14:43 IST

उध्दव ठाकरेंच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते

पुणे : सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार जे बोलेले त्याच्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. आम्ही महिलांसाठी उद्योग आणत आहोत. महिलांच्या उद्योगाला पुढे नेत आहोत. त्यामुळे अब्दुल सत्तारच्या प्रश्नावर मला काहीच बोलायचे नाही, असे वैतागून केंद्रीय सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या विषयावर बोलणे टाळले.

फिक्की महिला आघाडीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नवीन सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. हे गेले ते गेले असे उद्योगाबाबत बोलू नका. महाराष्ट्रात उद्योग येण्यासाठी वेटिंगवर आहेत. उध्दव ठाकरेंच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते, आता आहे, त्यामुळे मोठे उद्योग येतील. तसेच नोटबंदीमुळे रोजगार यायला काही बंधने आलेली नाहीत.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही नियम असतात. ते पाहून जाहीर होईल. पण दुष्काळ जाहीर न करताही मदत दिली जात आहे. उध्दव ठाकरेंच्या काळात त्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला का ? त्यांना शेतकऱ्यांना मदत देणार होते, दिली का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री असताना ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गेले का ? केवळ २६ मिनिटे ते गेले. मातोश्रीमध्ये बसणाऱ्या ठाकरेंनी टीका करणे बंद करावे.

भारत जोडो ही घोषणा काँग्रेस करत आहे. पण ज्या ठिकाणी यात्रा चालली आहेे, तिथे लोकं दुसरीकडे जात आहेत. राहुल गांधीचा पायगुण चांगला नाही. ते जिथे जातात तिथे जाऊन काँग्रेस तोडो अशी यात्रा होत आहे.

एका दिवसात उद्योग येत नाही !

कोकणात किती उद्योग आले या प्रश्नावर राणे म्हणाले, एका दिवसात उद्योग उभे राहत नाहीत. त्याला जमीन घ्यावी लागते. जिल्हाधिकारी जमीन सुपूर्द करतो. त्यातले आरक्षण पहावे लागते. मग उद्योजकाला जागा देणे, प्लांट पाडून देणे हे सर्व चालले आहे.

त्याचे नाव नको घेऊ

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयी एक प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर नारायण राणे म्हणाले, त्याचे नाव नको घेऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र.‘ असे बोलून ते तिथून निघून गेले.

टॅग्स :PuneपुणेAbdul Sattarअब्दुल सत्तारNarayan Raneनारायण राणे SocialसामाजिकPoliticsराजकारण