शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

'मला काहीच बोलायचे नाही...' अब्दुल सत्तारांच्या प्रश्नावर नारायण राणे चिडले

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 8, 2022 14:43 IST

उध्दव ठाकरेंच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते

पुणे : सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार जे बोलेले त्याच्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. आम्ही महिलांसाठी उद्योग आणत आहोत. महिलांच्या उद्योगाला पुढे नेत आहोत. त्यामुळे अब्दुल सत्तारच्या प्रश्नावर मला काहीच बोलायचे नाही, असे वैतागून केंद्रीय सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या विषयावर बोलणे टाळले.

फिक्की महिला आघाडीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नवीन सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. हे गेले ते गेले असे उद्योगाबाबत बोलू नका. महाराष्ट्रात उद्योग येण्यासाठी वेटिंगवर आहेत. उध्दव ठाकरेंच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते, आता आहे, त्यामुळे मोठे उद्योग येतील. तसेच नोटबंदीमुळे रोजगार यायला काही बंधने आलेली नाहीत.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही नियम असतात. ते पाहून जाहीर होईल. पण दुष्काळ जाहीर न करताही मदत दिली जात आहे. उध्दव ठाकरेंच्या काळात त्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला का ? त्यांना शेतकऱ्यांना मदत देणार होते, दिली का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री असताना ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गेले का ? केवळ २६ मिनिटे ते गेले. मातोश्रीमध्ये बसणाऱ्या ठाकरेंनी टीका करणे बंद करावे.

भारत जोडो ही घोषणा काँग्रेस करत आहे. पण ज्या ठिकाणी यात्रा चालली आहेे, तिथे लोकं दुसरीकडे जात आहेत. राहुल गांधीचा पायगुण चांगला नाही. ते जिथे जातात तिथे जाऊन काँग्रेस तोडो अशी यात्रा होत आहे.

एका दिवसात उद्योग येत नाही !

कोकणात किती उद्योग आले या प्रश्नावर राणे म्हणाले, एका दिवसात उद्योग उभे राहत नाहीत. त्याला जमीन घ्यावी लागते. जिल्हाधिकारी जमीन सुपूर्द करतो. त्यातले आरक्षण पहावे लागते. मग उद्योजकाला जागा देणे, प्लांट पाडून देणे हे सर्व चालले आहे.

त्याचे नाव नको घेऊ

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयी एक प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर नारायण राणे म्हणाले, त्याचे नाव नको घेऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र.‘ असे बोलून ते तिथून निघून गेले.

टॅग्स :PuneपुणेAbdul Sattarअब्दुल सत्तारNarayan Raneनारायण राणे SocialसामाजिकPoliticsराजकारण