शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आता त्यांचे काय होणार याचीच मला चिंता; त्यांच्यावरचा विश्वास आता उडाला- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 06:21 IST

यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेत लोकांमध्ये जाणार

पुणे : १९८० मध्येही ५६ पैकी ५० जण सोडून गेले होते. त्यांच्यापैकी ३ ते ४ सोडले तर सर्व जण नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाले. मी फक्त सहा लोकांचा नेता होतो. पक्ष पुन्हा बांधला. माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयात न जाता मी लोकांमध्ये जाणार आहे. जे घडलं त्याची मला चिंता नाही. जे गेले त्यांच्या भवितव्याची चिंता आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांच्या शपथेनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही न्यायालयात जाणार नाही. भांडण करणार नाही. पक्षाच्या धोरणाविरोधात काहींनी काम केले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी मोठी जबाबदारी सोपविली होती. त्यांच्यावरचा माझा विश्वास उडाला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर बँक, सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारातील लोक आज मंत्री झाले. याचा अर्थ त्या आरोपात वास्तव नव्हते. ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना पंतप्रधानांनी मुक्त केले. याचे श्रेय मोदी यांना आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सदाशिवराव मंडलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते अस्वस्थ होते, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला आमदार रोहित पवार उपस्थित होते.

मविआबरोबरच

आपण अजूनही महाविकास आघाडीबरोबर असल्याचे सांगत पवार म्हणाले की, देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते. पक्ष फुटला, असे मी म्हणणार नाही. अजित पवारांच्या विधानाशी सहमत असतो, तर आम्हीही त्यांच्या सोबत असतो.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार