शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शतावरीच्या रोपातून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:11 AM

पुणे : शतावरीच्या रोपांची लागवड करण्यापासून ते विक्रीकरेपर्यंतच्या बाबत देशभरातील शेकडो शेतकऱ्यांसह करार करुन कराराप्रमाणे एकरी पन्नास हजार रुपयांनी ...

पुणे : शतावरीच्या रोपांची लागवड करण्यापासून ते विक्रीकरेपर्यंतच्या बाबत देशभरातील शेकडो शेतकऱ्यांसह करार करुन कराराप्रमाणे एकरी पन्नास हजार रुपयांनी शतावरीचे पिक विकत घेऊनही त्याचे पैसे एकाही शेतकऱ्याला दिले नाहीत. ज्याना चेक दिला त्यांचा चेकही बाऊन्स झाला. तर अनेक शेतकऱ्यांचे पिक घेतलेच नाही त्यामुळे देशभरातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सुमारे कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा आरोप करत राज्यभरातील व कर्नाटकातील ६० शेतकरी आज पुण्यात येऊन कंपनीच्या मालकाच्या घरासमोर ठिय्या मांडून बसले होते.

पुण्यात आलेल्या या सर्व शेतकऱ्यांनी पोलिस आयक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शुन्य हर्बल ॲग्रो डेव्हलपर्स यांनी आयुर्वेदीक वनस्पतीची लागवड व काढणी पश्च्यात त्याच्या मुळ्या हमीभावाने खरेदी रण्याची हमी देऊन महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, तेलंगणा, येथील सहाशे शेतकऱ्यांना आठशे एकर क्षेत्रावरी प्रतीएकर ५० हजार रुपयांप्रमाणे रोपांचे घेऊन रोपे दिली व दीड वर्षांनी त्या रोपांच्या मुळ्या ५० रुप प्रती किलो दराने खरदेी करण्याबाबत करारनामा केला. मात्र दीड वर्षानंतर त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मुळ्या काढणी करून नेल्या त्याचे पैसे मात्र दिलेच नाहीत. तर काहींच्या मुळ्या दोन वर्षापासून खरेदीच केल्या नाहीत त्यामुळे ज्यांच्या खरेदी केल्या त्यांना पेमेंट साठी सातत्याने पाठपुरावा केल्यावर मात्र त्यांनी काही शेतकऱ्यांना चेक दिला मात्र तो बॅंकेत वठला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शुन्य हर्बल ॲग्रोचे ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

--

आज शेतकरी पुण्यात दाखल

--

चार-पाच राज्यातील शेतकऱ्यांनी या कंपनीशी करार करून ५०-५० एकरात शतावरीची लागवड केली मात्र दोन वर्षानंतर त्यापोटी एक रुपयाही त्यांनी दिला नाही अशे सुमारे साठ शेतकरी आज पुण्यात आले. त्यातील कर्नाटक, विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी तब्बल रात्रभर प्रवास करून पुणे गाठले. मात्र कंपनीचे कार्यालय ज्या ठिकाणी होते तेथे सध्या हॅास्पीटल उभे राहिले आहे व तेथे कंपनीची चौकशी करू नये असा फलक लावला आहे. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पाटणकर यांच्या धायरी येथील निवससस्थानी गेले मात्र तेेथे ऋषिकेश पाटणकर यांच्या मातोश्री व पत्नी होत्या. त्यांच्याकडून निरोप मिळाला की दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्तालयात जाऊन त्यांच्यावर फसवणुकीबद्दल तक्रार दिली.

---