शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

राज्यात महिलांची मानवी तस्करी; महिला आयोग अत्याचाराच्या घटनांची गंभीर दखल घेणार

By राजू इनामदार | Updated: October 14, 2022 18:02 IST

राष्ट्रीय व राज्य महिला आयोग कृती कार्यक्रम तयार करणार

पुणे : देशात महिलांची मानवी तस्करी होत असण्यामागे आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग संयुक्त कृती कार्यक्रम राबवण्याबाबत गंभीर आहे. असा कार्यक्रम तयार करण्यासंबधी राष्ट्रीय महिला आयोगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

राज्य महिल आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांची दिल्लीत भेट घेतली. औरंगाबाद शहरामधून ३९ दिवसांमध्ये ५८ महिला गायब झाल्यासंबधी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत चाकणकर यांनी दिल्लीत शर्मा यांची भेट घेतली व त्यांना राज्यातील या घटनांची माहिती दिली. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात केलेल्या कामाची माहितीही त्यांना शर्मा यांना दिली.

चाकणकर यांनी सांगितले की शर्मा यांनी याची गंभीर दखल घेतली. देशातही अशा काही घटना होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याबाबत एखादा संयुक्त कृती समिती राबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली व तशा सुचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य महिला आयोग यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे असे त्यांना सांगितले असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.

दरम्यान राज्यातील घटनांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगाच्या माध्यमातून पत्र पाठवले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. राज्यातून महिला व मुली गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांकडून हरवलेल्या मुली व महिलांबाबतचे अहवाल मिळत असून त्यातील संख्येवरून ही बाब चिंताजनक असल्याचे दिसते आहे. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी या पत्रात चाकणकर यांनी मुख्यमंत्ऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ