शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
4
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
5
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
6
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
7
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
8
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
9
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
10
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
11
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
12
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
13
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
14
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
15
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
16
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
17
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
18
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
19
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
20
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट

सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा तयार करायचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:09 AM

पुणे: राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावा, यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला असला तरी सतरा नंबरचा ...

पुणे: राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावा, यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला असला तरी सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना अनेक अडचणी येणार असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. तसेच, दहावीत कोणतेही अंतर्गत मूल्यमापन झालेले नसताना आमचा निकाल कसा तयार केला जाणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावीच्या निकालाचीसाठी मूल्यांकन पद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यात नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्याबाबत संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी ते नववी या कालावधीमध्ये मिळवलेल्या गुणांची टक्केवारी इयत्ता दहावीचा निकालासाठी घेतली जाणार आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांकडे त्यांचे इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे गुणपत्रक उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या जुन्या नोंदणी संबंधित शाळेकडून मागविण्यास बराच कालावधी जाणार आहे. परिणामी, १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना या निकालाबाबत शाळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

पुण्यासह अनेक ठिकाणी खासगी क्लास (शिकवणी)चालकांकडून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. या क्लास चालकांनी काही शाळांबरोबर अलिखित करार केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी शाळा घेणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासगी क्लास चालकांनी आमच्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या आहेत, त्याचआधारे आमचा निकाल जाहीर केला जाईल ,असा चुकीचा समज बहुतेक विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे.

-----------

सतरा नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळांमार्फत काही प्रकल्प लिहून घेतले जातात. तसेच संबंधित विद्यार्थ्यांची अंतर्गत (तोंडी) परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे काहीच घेता आले नाही. तसेच इयत्ता नववीमध्ये नापास झाल्याने सतरा नंबरचा अर्ज भरला. आता नववीप्रमाणे आम्ही दहावीतही नापास होणार का ? असा संभ्रम काही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

------------------

इयत्ता दहावीत १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी पाचवी ते नववीपर्यंतच्या गुणांची टक्केवारी आवश्यक आहे. ही टक्केवारी मिळविण्यासाठी शिक्षकांना व शाळा प्रशासनाला अनेक अडचणी येणार आहेत. तसेच आमचा निकाल कसा लावला जाणार, याबद्दल १७ नंबरचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य

-----------------

मी एका खासगी क्लासमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेचा १७ नंबरचा अर्ज भरला आहे. क्लासने घेतलेल्या परीक्षेच्या आधारावर आमचा निकाल जाहीर करतील, असे आम्हाला वाटते. त्याचप्रमाणे कोणत्याही परीक्षा दिल्या नाहीत तर आमचा निकाल कसा प्रसिद्ध करणार ? इयत्ता नववीत माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले नव्हते. त्याचा परिणाम दहावीच्या निकालावर होणार आहे का ? याबाबत संभ्रम आहे.

- मयूर जाधव, विद्यार्थी