शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे? - सुरेश द्वादशीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 01:16 IST

काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे.

पुणे - काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे. पंडित नेहरूंना आपल्या लष्कराच्या स्थितीची जाणीव होती. हे प्रश्न युद्धाने सुटणार नाहीत याची देखील त्यांना पूर्णपणे कल्पना होती म्हणूनच त्यांनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला, तो एक धोरणाचा भाग होता. यावरून त्यांच्यावर टीका केली जात असली तरी काश्मीर प्रश्नाबाबत नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.देशाचे नेतृत्व करणारे मग ते नेहरू किंवा नरेंद्र मोदी असोत, देशाचे दुबळेपण सांगू शकत नाहीत. ‘आम्ही तयार आहोत’ असेच सांगावे लागते, त्यामागचे लष्कराचे वास्तव जाणून घ्यायला हवे असेही ते म्हणाले. साधना साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकीर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजावादाची बीजे रोवू पाहात होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहात आहेत अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. मात्र नेहरूंना गरीब-श्रीमंत ही विषमता दूर करणारा समाजवाद रुजवायचा होता. दरम्यान सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी भूमिका मांडली होती. मात्र ही भूमिका पंडितजींना मान्य नव्हती. सरतेशेवटी पटेलांनाच काही काळानंतर संघावर बंदी घालावी लागली.देशाला कम्युनिस्टांपासून नव्हेतर धर्मांधांपासून धोका आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला, कठोर निर्णयही घ्यावे लागले. गांधीजींचा वध ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटूता नव्हती. त्यांना जोडणारा पूल हे गांधीजी होते. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. अणुऊर्जा केंद्र, शैक्षणिक संस्था, क्षेपणास्त्र अशा अनेक गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर