शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे? - सुरेश द्वादशीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 01:16 IST

काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे.

पुणे - काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे. पंडित नेहरूंना आपल्या लष्कराच्या स्थितीची जाणीव होती. हे प्रश्न युद्धाने सुटणार नाहीत याची देखील त्यांना पूर्णपणे कल्पना होती म्हणूनच त्यांनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला, तो एक धोरणाचा भाग होता. यावरून त्यांच्यावर टीका केली जात असली तरी काश्मीर प्रश्नाबाबत नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.देशाचे नेतृत्व करणारे मग ते नेहरू किंवा नरेंद्र मोदी असोत, देशाचे दुबळेपण सांगू शकत नाहीत. ‘आम्ही तयार आहोत’ असेच सांगावे लागते, त्यामागचे लष्कराचे वास्तव जाणून घ्यायला हवे असेही ते म्हणाले. साधना साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकीर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजावादाची बीजे रोवू पाहात होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहात आहेत अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. मात्र नेहरूंना गरीब-श्रीमंत ही विषमता दूर करणारा समाजवाद रुजवायचा होता. दरम्यान सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी भूमिका मांडली होती. मात्र ही भूमिका पंडितजींना मान्य नव्हती. सरतेशेवटी पटेलांनाच काही काळानंतर संघावर बंदी घालावी लागली.देशाला कम्युनिस्टांपासून नव्हेतर धर्मांधांपासून धोका आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला, कठोर निर्णयही घ्यावे लागले. गांधीजींचा वध ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटूता नव्हती. त्यांना जोडणारा पूल हे गांधीजी होते. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. अणुऊर्जा केंद्र, शैक्षणिक संस्था, क्षेपणास्त्र अशा अनेक गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर