शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

डेटापॅकमध्ये किती ही महागाई? दुधाइतका खर्च मोबाइल रिचार्जवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 09:05 IST

मोबाईलचे नेट रिचार्ज करण्यासाठी आता विविध कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत...

पुणे : महागाईच्या या काळात एका कुटुंबाचा मोबाईल रिचार्जचा खर्चदेखील चांगलाच वाढला आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल असून, नेट रिचार्जही महिन्याला करावे लागत आहे. त्यामुळे मध्यम वर्गातील कुटुंबीयांच्या घरातील डेटाचा खर्च महिनाभराच्या खर्चापेक्षाही अधिक होत आहे.

एका रिचार्जचा महिन्याचा खर्च २९९

- मोबाईलचे नेट रिचार्ज करण्यासाठी आता विविध कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. त्यामध्ये पूर्वी महिन्याला १९९ रुपये नेट रिचार्ज होते. आता ते २९९ आणि त्याहून अधिक केले आहेत. सर्वच कंपन्यांनी नेट रिचार्जचे दर चांगलेच वाढविले आहेत.

एका घरात किमान तीन मोबाईल :

पूर्वीसारखे एकत्र कुटुंब पद्धत राहिली नाही, त्यामुळे शहरातील प्रत्येकी कुटुंबात नवरा-बायको आणि एक मुलगा, मुलगी असे तिघांचे किंवा चौघांचे कुटुंब आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येकाचे महिन्याचे रिचार्ज २९९ म्हटले तरी महिन्याला ११९६ रुपये बिल होते. काही जणांना दररोज एक जीबी डाटा मिळतो, तो पुरत नाही. मग ते एक्स्ट्रा रिचार्ज करतात.

ग्रामीण भागातही वाढले रिचार्ज सेंटर :

- शहरातच नव्हे, तर गावा-गावांत मोबाईलची संख्या वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रिचार्ज सेंटरची संख्याही वाढली आहे. शंभर घरांचे गाव असेल तर तिथे जवळपास चारशे-पाचशे मोबाईल असतात. त्यांचे रिचार्ज करण्यासाठी ठिकठिकाणी सेंटर होत आहेत.

दूध अन् मोबाईल रिचार्जचा खर्च सारखाच

घरांमध्ये दररोज एक लिटर दूध घेतले जाते. लिटरचा खर्च दरराेज साधारण ५० रुपयांच्या आसपास आहे. त्यानुसार महिन्याला १५०० रुपये खर्च येतो. ज्यांच्या घरात पाच-सहा जण राहतात. त्यांचा मोबाईल रिचार्जचा खर्च दुधापेक्षा अधिक होतो.

 

घरात आम्ही चौघेजण आहोत. प्रत्येकाकडे मोबाईल असून, महिन्याला जवळपास दीड हजार खर्च येतो. दुधाचाही खर्च जवळपास तेवढाच येतो. दोन्ही गोष्टी अत्यावश्यक झाल्या आहेत.

- वैशाली टिळेकर, आयटी कर्मचारी

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइल