शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

आपली पत्रे लिक कशी झाली? : चंद्रशेखर यांचा वरवरा राव यांना सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 22:07 IST

परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर आहे.आपल्यातील संभाषणात अधिक गुप्तता पाळणे गरजेचे आहे, असा मेल चंद्रशेखर यांनी ४ जुलै रोजी राव यांना पाठवला होता.

ठळक मुद्देपोलिसांच्या हाती आला मेलमधील संवादराव यांनी १४ जुलैला उत्तर दिले असून त्यांच्या मेलमध्ये नमूद पोलिसांनी सादर केलेली पत्र खोटी असल्याचा बचाव पक्षाकडून आरोप

पुणे :  तपास यंत्रणा कोणत्या पद्धतींचा वापर करून या प्रकरणाचा तपास करत आहे? आपली पत्रे लिक कशी झाली? त्याला जबाबदार कोण आहे? असे सवाल करणारा मेल सेंट्रल कमिटेची प्रमुख चंद्रशेखर यांनी कवी वरवरा राव यांना पाठवला असल्याचे सरकारी वकिलांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. त्यावर राव यांनी तंत्रज्ञान समजावून घेवू, असे उत्तर चंद्रशेखर यांना दिल्याचा युक्तिवाद करण्यात आला.  एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये माओवाद्यांचा संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या शोमा सेन, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्सालवीस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी सादर केलेली पत्र खोटी असल्याचा आरोप बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र हे पत्र खरे असल्याची सांगत जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी राव आणि चंद्रशेखर यांच्यात ४ ते १४ जुलै २०१८ दरम्यान झालेल्या मेलवरील संभाषणाची माहिती न्यायालयाला दिली.    दिल्ली आणि महाराष्ट्रातून पाच जणांना अटक केल्यानंतर संघटनेतील सदस्यांचे मनोबल खचले आहे. आपली पत्रे लिक कशी झाली? त्याला जबाबदार कोण आहे? तपास यंत्रणा कोणत्या पद्धतीचा वापर करीत आहे हे समजावून घेण्याची गरज आहे. आता याबाबत काय करता येवू शकते याचे नियोजन करावे. परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर आहे. आपल्यातील संभाषणात अधिक गुप्तता पाळणे गरजेचे आहे, असा मेल चंद्रशेखर यांनी ४ जुलै रोजी राव यांना पाठवला होता. त्यावर राव यांनी १४ जुलैला उत्तर दिले असून त्यांच्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे की, संदेशांमध्ये गुप्तता ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेत आहे. पोलिसांच्या तपासाबाबत अहवाल करून त्याची माहिती पुरविण्यात येईल. तसेच यापुढे वैयक्तिक मोबाइल फोन आणि संगणकांच्या वापरासाठी अधिक कठोर नियम ठेवण्यात येतील. असा संवाद या मेलमध्ये आहे. सुधा भारद्वाज यांच्याविरूध्द पाच पत्रे समोर आली आहेत. ती न्यायालयासमोर ठेवण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण पुरव्याच्या पातळीवर नसून तपासाच्या पातळीवर असल्याने आरोपींचा जामीन फेटाळावा अशी मागणी अ‍ॅड. पवार यांनी केली. ...........................तपास भरोसा ठेवण्यासारखा नाही न्यायालयात सादर करण्यात आलेली पत्र तपाण्यात आलेली नाही. पत्राच्या प्रती माध्यमांना मिळतात मात्र त्याची एकही प्रत पोलीस न्यायालयात वकीलांना दाखवत नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास भरोसा ठेवण्यासारखा नाही. तर मिलिंद एकबोटेंवर युएपीए अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल करीत सुधा भारद्वाज यांच्यावकील अ‍ॅड. रागिनी अहुजा यांनी जामीन मंजूर करावा, अशी मागणी केली. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक