शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र

By राजू इनामदार | Updated: October 8, 2024 16:12 IST

संपत्ती जाहीर केल्यावर कामधंदा, व्यवसाय नसलेल्या उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे यातून दिसतात

पुणे: निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने आपली संपत्ती जाहीर करावी असा नियम करणाऱ्या भारतीय लोकशाहीचे जगात कौतूक होते, मात्र आता ही संपत्ती कशी मिळवली तेही जाहीर करण्याचे बंधन घालावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. आवश्यकता भासल्यास संसदेने यासंबधीचे विधेयक तयार करून मंजूर करावे असेही पंचायतीने म्हटले आहे.

पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष विलास लेले यांनी सांगितले की सन १९८५ मध्ये तत्कालीन निवडणुक आयुक्त टी.एन. शेषण यांनी निवडणूक नियमांमध्ये ही सुधारणा केली. तेव्हापासून प्रत्येक उमेदवाराला आता आपली संपत्ती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यातून अनेक गोष्टी उघड होतात. काहीही कामधंदा, व्यवसाय नसलेल्या उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे यातून दिसतात. व्यवसाय म्हणून समाजकार्य टाकले जाते. तरीही त्यांची संपती कोट्यवधी रूपयांची असते. करोडो रूपयांचे दागदागिने असतात.

संपत्ती जाहीर केली म्हणजे संपले असा हा प्रकार आहे. त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे ही संपत्ती आली कोठून? कोणत्या उद्योगातून कमवली? त्यात वाढ कशी झाली? असाही एक स्वतंत्र रकाना उमेदवारी अर्जात करावे असे पंचायतीने आयोगाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर तसेच सदस्य रविंद्र वाटवे, प्रकाश राजगुरू, सुनील नाईक, अंजली देशमुख, वीणा दीक्षित, राजश्री दीक्षित, विजया वाघ, अंतली करंबळेकर, अंजली फडणीस, माधुरी गानू यांच्याही स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत. हा बदल केला तर भारतीय राजकारणात खऱ्या अर्थाने सच्छिल व सज्जन व्यक्ती येतील. राजकारणाचा पोत सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा पंचायतीने व्यक्त केली आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणMONEYपैसाbusinessव्यवसाय