शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष देशात कसा याेग्य ठरेल 'समान नागरी कायदा'? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 14:46 IST

भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाला समान नागरी कायदा लागू करणे योग्य नाही, असे मत देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले...

पुणे : देशाची राज्य घटना बनविणाऱ्या व्यक्तीमध्ये जास्त लोक हिंदू होते. त्यांना समान नागरी कायदा करावा वाटला नाही. कारण भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाला समान नागरी कायदा लागू करणे योग्य नाही, असे मत देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले.

साधना साप्ताहिक ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची मुलाखत संकल्प गुर्जर यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत, सदस्य सुहास पळशीकर, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, माजी अध्यक्ष विजया चौहान आदी उपस्थित होते. एस. वाय. कुरेशी म्हणाले, देशाच्या राजकारणात लोकसंख्येच्या तुलनेत महिला लोकप्रतिनिधीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते केवळ ९ टक्के आहे. ३० कोटी जनता अशिक्षित आहे. राजकीय पक्षांनी दिलेल्या उमेदवारीमध्ये महिलांचे निवडून येण्याचे प्रमाण जास्त आहे.

निवडून येण्याची क्षमता हाच तिकीट देताना निकष लावला जाताे. २००९ च्या निवडणुकीत १६३ लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यानंतरच्या निवडणुकीत यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. २०१४ च्या निवडणुकीत १७३ तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत २३३ लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर खून, बलात्कार, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे आहेत.

तो मूर्खपणा होता

दिल्लीत लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी महिला खेळाडू आंदोलन करत होत्या; पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. हा मूर्खपणा होता. या प्रकरणी साधा गुन्हाही दाखल केला जात नव्हता. अखेर सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या मला वेदना झाल्या आहेत, असेही एस. वाय. कुरेशी यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाचे अधिकार कमी करण्याचा घाट

निवडणुकीबाबत देश विश्वगुरू आहे. आपल्या देशाने १०८ देशांच्या निवडणूक आयुक्तांना प्रशिक्षण दिले आहे. पण निवडणूक आयोगाचे अधिकार नवीन सुधारणा विधेयक आणून कमी करण्याचा घाट घातला जात आहे, असे ही देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी