शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

धर्मनिरपेक्ष देशात कसा याेग्य ठरेल 'समान नागरी कायदा'? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 14:46 IST

भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाला समान नागरी कायदा लागू करणे योग्य नाही, असे मत देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले...

पुणे : देशाची राज्य घटना बनविणाऱ्या व्यक्तीमध्ये जास्त लोक हिंदू होते. त्यांना समान नागरी कायदा करावा वाटला नाही. कारण भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाला समान नागरी कायदा लागू करणे योग्य नाही, असे मत देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले.

साधना साप्ताहिक ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची मुलाखत संकल्प गुर्जर यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत, सदस्य सुहास पळशीकर, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, माजी अध्यक्ष विजया चौहान आदी उपस्थित होते. एस. वाय. कुरेशी म्हणाले, देशाच्या राजकारणात लोकसंख्येच्या तुलनेत महिला लोकप्रतिनिधीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते केवळ ९ टक्के आहे. ३० कोटी जनता अशिक्षित आहे. राजकीय पक्षांनी दिलेल्या उमेदवारीमध्ये महिलांचे निवडून येण्याचे प्रमाण जास्त आहे.

निवडून येण्याची क्षमता हाच तिकीट देताना निकष लावला जाताे. २००९ च्या निवडणुकीत १६३ लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यानंतरच्या निवडणुकीत यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. २०१४ च्या निवडणुकीत १७३ तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत २३३ लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर खून, बलात्कार, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे आहेत.

तो मूर्खपणा होता

दिल्लीत लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी महिला खेळाडू आंदोलन करत होत्या; पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. हा मूर्खपणा होता. या प्रकरणी साधा गुन्हाही दाखल केला जात नव्हता. अखेर सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या मला वेदना झाल्या आहेत, असेही एस. वाय. कुरेशी यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाचे अधिकार कमी करण्याचा घाट

निवडणुकीबाबत देश विश्वगुरू आहे. आपल्या देशाने १०८ देशांच्या निवडणूक आयुक्तांना प्रशिक्षण दिले आहे. पण निवडणूक आयोगाचे अधिकार नवीन सुधारणा विधेयक आणून कमी करण्याचा घाट घातला जात आहे, असे ही देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी