शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

माळीणवासीयांना पुढील वर्षी घरे

By admin | Updated: September 22, 2015 03:02 IST

माळीण पुनर्वसनासाठी ८६६ चौरस फुटांची दोन एकत्रित घरे बांधण्याला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी संमती दिली असून, यासाठी १२.६० लाख रुपये खर्च येणार आहे

घोडेगाव : माळीण पुनर्वसनासाठी ८६६ चौरस फुटांची दोन एकत्रित घरे बांधण्याला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी संमती दिली असून, यासाठी १२.६० लाख रुपये खर्च येणार आहे. या कामांसाठी माळीण ग्रामस्थांचा लोकसहभाग घेतला जाणार असून, घरांची कामे डिसेंबरमध्ये सुरू करून मे २०१६ अखेर घरांचा लोकार्पण सोहळा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज सांगितले. घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात माळीण पुनर्वसनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माळीण ग्रामस्थ, लोकप्रतिनधी व अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी यांनी आयोजित केली होती. या बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, जिल्हा टाउन प्लॅनर जितेंद्र भोपळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, माळीणचे सरपंच दिगंबर भालचीम, सावळेराम लेंभे, माळीण गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक देवराम झांजरे, क्रेडाई पुणेचे डॉ. दिवाकर अभ्यंकर, संजीव कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, अश्विन त्रिमल व मोठ्या संख्येने माळीण ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी वळसे पाटील म्हणाले, की दोन घरे एकत्र बांधण्याचा प्रस्ताव अतिशय उत्तम आहे. १२.६० लाख रुपयांत ८६६.७३ चौरस फुटाच्या एकत्रित दोन घरांना लोकांनी मान्यता द्यावी. तसेच माळीण दुर्घटनेत ज्याला एक रुपयादेखील मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना लोकसहभागाची रक्कम भरण्याची आर्थिक झळ लागू देणार नाही याची व्यवस्था केली जाईल. मात्र ज्याला पैसे मिळाले आहेत त्यांनी लोकसहभाग द्यायला हरकत नाही. ८६६ चौरस फुटांची दोन एकत्रित घरे बांधली जाणार व यासाठी १२.६० लाख रुपये खर्च येणार अथवा ४६३ चौरस फुटांचे घर होणार असून, यासाठी ६.३० लाग रुपये खर्च येणार. या दोनपैकी ग्रामस्थ संमती देतील तो प्लॅन निश्चित केला जाणार आहे.घराची किंमत ६.३० लाख असून, शासन २ लाख रुपये प्रत्येक घरामाग देईल. ४.३० लाख रुपयांची तफावत असून, १.१० लाख रुपये लाभार्थ्यांनी लोकसहभाग द्यावे. उर्वरित ३.२० लाख रुपये सीएसआर व इतर माध्यमातून गोळा केले जाणार. हे पैसे गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींची असणार.४ आॅक्टोबरला मूलभूत सोई-सुविधांची कामे सुरू होतील. १५ डिसेंबरला घरांचे काम सुरू करणार. ८ मे २०१६ पर्यंत घरांची कामे पूर्ण होणार. मेअखेर घरांचे लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मूलभूत सोई-सुविधांसाठी ६.३० कोटी रुपये शासन खर्च करणार. कामांच्या गुणवत्तेबाबत त्रयस्थ संस्था पाहणी करणार. ३० सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांनी लोकसहभागाचा निधी जमा करावा.पावसामुळे काम बंद असून, पाऊस कमी झाल्याबरोबर कामे सुरू करणार. योगेश राठी यांनी क्रेडाईची मदत घेऊन बनविलेला प्लॅन निश्चित करण्यात आला.