शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

घरोघरी बसणार आता नळजोडाला मीटर, व्यावसायिकांपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:20 IST

समान पाणी योजनेची निविदा आता मंजूर झाल्याने लवकरच घरोघरी पाणी मोजणारे मीटर नळजोडाला बसवले जाणार आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यानंतर पुणेकरांना पैसे मोजावे लागतील. वीज, गॅस ज्याप्रमाणे जपून वापरले जाते तसेच यापुढे पाणीही जपूनच वापरावे लागणार आहे.

पुणे : समान पाणी योजनेची निविदा आता मंजूर झाल्याने लवकरच घरोघरी पाणी मोजणारे मीटर नळजोडाला बसवले जाणार आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यानंतर पुणेकरांना पैसे मोजावे लागतील. वीज, गॅस ज्याप्रमाणे जपून वापरले जाते तसेच यापुढे पाणीही जपूनच वापरावे लागणार आहे.संपूर्ण शहरात १ हजार ४०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याच वेळी पाण्याच्या प्रत्येक नळजोडाला मीटर बसवले जाईल. एकूण ३ लाख मीटर बसवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात फक्त व्यावसायिक वापराच्या नळजोडांना मीटर बसवले जातील. ही संख्या साधारण ५० ते ६० हजार आहे. मात्र मीटर बसवतानाच या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असा प्रशासनाचा अंदाज आहे. अनेकांना नळजोड घरगुती वापराचा नोंदवला आहे, प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात आहे. प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत ही पाणीचोरी सापडणार आहे, त्यांची घरगुती वापराची नोंद रद्द करून लगेचच त्यांना व्यावसायिक दर लावण्यास सुरुवात होईल.व्यावसायिक वापरकर्त्यांची संख्या निदान १ लाख तरी असेल, पण नोंदीच झालेल्या नाहीत. याशिवाय नळजोड अर्ध्या इंचाचा, पाणीपट्टीही तशीच जमा केली जाते, प्रत्यक्षात मात्र तो १ इंच आहे, किंवा नळजोड आहे मात्र त्याची नोंदच नाही अशीही अनेक प्रकरणे या समान पाणी योजनेच्या तपासणीत आढळणार आहेत, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या तपासणीत महापालिकेच्या एकूण नळजोडांमध्ये वाढही होणार आहे. त्यातूनही पाणीपट्टीचे उत्पन्न वाढणार असून, अनधिकृत नळजोड दंड आकारणी करून नियमितही केले जाणार आहेत.एका मीटरची किंमत साधारण ८ ते १० हजार इतकी आहे. ही सर्व मीटर अत्याधुनिक असून, संवेदक (सेन्सर) बसवलेली आहेत. त्यात काही फेरफार करण्याचा प्रयत्न झाला तर लगेचच मीटरसाठीच्या विभागात त्याची माहिती पोहोचेल, अशी त्याची रचना आहे. तसेच किती पाणी वापरले गेले हे त्या मीटरवरून तर कळणार आहेच, शिवाय पाणी मीटर विभागाची जबाबदारी सांभाळणाºया अधिकाºयालाही ती बसल्या जागेवर दिसेल. त्याचप्रमाणे बिल द्यायला आलेल्या कर्मचाºयांना त्यासाठी मीटर तपासावे लागणार नाही. तो त्या परिसरातून फिरायला लागला की पाण्याचा व्यावसायिक वापर करणाºया ग्राहकांकडून ती वसूल केली जाईल. हवे असेल तर संबधित ग्राहकाला त्यासाठी हप्ते करून दिले जातील व पाण्याच्या बिलात ते दाखवले जातील.घरगुती ग्राहकांना मात्र मीटरचे पैसे लावले जाणार नाहीत, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शहराचे पाच विभाग करण्यात आले आहेत. त्यात पुन्हा उपविभाग आहेत. प्रत्येक विभागात साधारण १ हजार नळजोड येतील अशी रचना करण्यात आली आहे. या रचनेला सुसंगत अशीच जलवाहिन्यांचीही रचना करण्यात येणार आहे. या १ हजार नळजोडांवरचे मीटर, त्यांना दिलेले पाणी, त्यांनी वापरलेले पाणी, त्याचे बिल, त्यांनी जमा केलेले बिल याची काटेकोर माहिती ठेवण्यात येणार आहे. त्यासाठीच स्वतंत्रपणे निविदा काढून खासगी कंपनीकडे हे काम दिले जाण्याची शक्यता आहे. त्याबदल्यात महापालिका त्यांना पैसे देईल. या रचनेत पाण्याची बचत होणे अपेक्षित आहे. पैसे द्यावे लागले म्हणजे पाणी जपूनच वापरले जाईल हे यात गृहीत धरण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी