शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

घरांबाबत अधिकारी उदासीन, आदिवासींची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:55 AM

वषार्नुवर्षे स्वत:च्या हक्काच्या निवा-यापासून वंचित असलेल्या गरजू व आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी पूर्वीच्या सरकारच्या इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून मोदी सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना’ असे नामकरण २३ मार्च २०१६ रोजी करून, या योजनेतअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गरीब जनतेला १ कोटी घरे बांधून देण्याचा भव्य संकल्प केला आहे.

पौड - वषार्नुवर्षे स्वत:च्या हक्काच्या निवाºयापासून वंचित असलेल्या गरजू व आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी पूर्वीच्या सरकारच्या इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून मोदी सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना’ असे नामकरण २३ मार्च २०१६ रोजी करून, या योजनेतअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गरीब जनतेला १ कोटी घरे बांधून देण्याचा भव्य संकल्प केला आहे.या योजनेला अधिकची जोड म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजनाही केंद्र सरकारने सुरू केली आहे. २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याचा स्वप्नवत संकल्पही या सरकारने सोडला आहे.परंतु, मुळशी तालुक्यात प्रशासनातील संबंधित खात्याच्या अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे सदर योजना केवळ कागदावरच राहणार आहे. सरकारचे हे घरकुल योजनेचे स्वप्न केवळ स्वप्नच राहणार असल्याचे चित्र आहे.पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागाखरेदी अर्थसाह्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समितीच्यागटविकास अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापणे अपेक्षित असताना योजना सुरू होऊन दोन वर्षे उलटली असली, तरी जानेवारी २०१८ पर्यंत ही समितीच अस्तित्वात नसल्याने अद्यापपर्यंत या योजनेचा एकाही लाभार्थ्याला लाभ मिळालेला नसल्याचे समोर आले आहे.हद्द म्हणजे, मुळशी तालुक्यात शेकडो कातकरी बांधवांना आजही स्वत:च्या हक्काचे घर तर सोडाच; पण हक्काची जागाही नावावर नसल्याचे भयानक वास्तव आहे.खरेदीखत करून झाले वर्षशासनाच्या योजनांच्या भरवशावर न राहता आंदेशे येथील १२ कातकरी बांधवांनी व्याजाने व उसने पैसे उभे करून आपले प्रतिनिधी बाळू सीताराम वाघमारे यांच्या नावे घराच्या बांधकामासाठी एक खासगी जमीन विकत घेतली. त्याचे खरेदीखत होऊन वर्ष संपले तरी महसूल विभागाच्या संबंधित अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे व सदर खरेदीदार कातकरी शेतकरी नसल्याचे कारण पुढे करीत अद्याप त्या जागेची नोंदच करणे बाकी ठेवले आहे.सदर जागेची नोंदच होणार नव्हती, तर खरेदीखतच मंजूर का करण्यात आले? जमीन खरेदीसाठी जागामालकाला दिलेली मोठी रक्कम व खरेदीखताचे पैसे वाया जाणार का? अशी भीती व्यक्त होतआहे.गेले वर्षभर तलाठी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे उंबरे झिजवून अद्याप हाती काहीच लागले नसल्याची खंत आंदेशे येथील आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. आदिवासी बांधवांना एका खासगी कंपनीकडून सीएसआर निधीतून मोफत घरे बांधून दिली जाणार आहेत.

टॅग्स :Homeघर